राजस्थानात  नगरसेवक पदासाठी दहावी पासची अट कॉंग्रेसने  केली रद्द

ashok_gehalot
ashok_gehalot

जयपूर :  राजस्थान मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत कॉंग्रेस पक्षाने नगरसेवक  आणि इतर पदांसाठी सध्या असलेली दहावी पासची अट रद्द केली आहे.

वसुंधरा राजे मुख्यमंत्री असताना भाजपने जिल्हा परिषद - पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक पदाची निवडणुक लढविण्यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास केलेली होती. तर सरपंचपदासाठी शैक्षणिक पात्रता आठवी पास करण्यात आली होती.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लोकशाहीमध्ये उमेदवारावर शैक्षणिक पात्रतेची अट घालणे चुकीचे असल्याची भुमिका निवडणुक प्रचारात घेतली होती. त्यानुसार मंत्री मंडळाच्या पहिल्याच बैठकीत शैक्षणिक पात्रतेची अट काढून टाकण्यात आली आहे.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com