राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडायला हवे, स्टॅलिन यांची सरकारकडे मागणी

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडायला हवे, स्टॅलिन यांची सरकारकडे मागणी

चेन्नई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगणाऱ्या ए. जी. पेरारीवलन याच्यासह दोषींची सुटका करण्याबाबत राज्यपालांकडे शिफारस करावी, अशी मागणी आज द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी तमिळनाडू सरकारकडे केली आहे. 

तमिळनाडू सरकारने कॅबिनेट बैठकीत सुटकेसंदर्भात प्रस्ताव मंजूर करावा आणि हत्ये प्रकरणातील दोषींची मुक्तता करण्याबाबत राज्यपालांना प्रस्ताव द्यावा, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. दोषीत मुरुगन, संथन, पेरारीवलन, नलीनी, रॉबर्ट पायस, रविचंद्रन आणि जयकुमार यांचा समावेश आहे. 

गेल्या 27 वर्षांपासून ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. कलम 161 नुसार राज्य सरकार अधिकाराचा वापर करत राज्यपालांकडे दोषींची सुटका करण्याच्या मागणीचा प्रस्ताव मांडू शकतो, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com