मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी मला बोलावले होते!

मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी मला बोलावले होते!

कोल्हापूर : मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी पक्षप्रमुखांनी बोलविले होते. पण तांत्रिक कारणामुळे एकूण आमदारांच्या संख्येच्या तुलनेत पंधरा टक्‍यांवर मंत्र्यांची संख्या गेल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. कॅबिनेट मंत्र्यांना ज्या सुविधा आहे त्या या पदालाही आहेत. त्यामुळे आपल्याला न्याय मिळाल्याचे समाधान आहे, असे राज्य नियोजन मंडळाचे नूतन कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीररसागर यांनी येथे सांगितले . 

क्षीरसागर यांनी 'सकाळ'च्या शहर कार्यालयास आज सायंकाळी भेट दिली. त्यावेळी विविध मुद्दयांवर त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले,  राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून कोल्हापुरच्या विकासाला सर्वोच्य प्राधान्य देणार असल्याचे मंडळाचे नूतन कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीररसागर यांनी आज सांगितले. रंकाळ्याच्या विकासासाठी पन्नास ते साठ कोंटीचा निधी खेचून आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरच्या प्रश्‍नांना प्राधान्य दिले आहे. पुढील आठवड्यात मुंबईत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव अजोय मेहता यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. त्यावेळी प्रलंबित प्रश्‍नांवर चर्चा होईल. याच बैठकीत रंकाळ्याच्या विकासासाठी पन्नास ते साठ कोटींचा निघी जाहीर करता येईल यासाठी प्रयत्नशील असणार आहे, असेही ते म्हणाले .  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com