राज यांचा पहिला प्रश्‍न होता,पवारसाहेब, खरे बोलायचा त्रास होतो का ? 

राज यांचा पहिला प्रश्‍न होता,पवारसाहेब, खरे बोलायचा त्रास होतो का ? 

पुणे : "" राज ठाकरे यांनी शरद पवारांना पहिला प्रश्‍न विचारला राजकारणात खरे बोलायचा त्रास होतो का ? त्यावर पवारसाहेब म्हणाले, की राजकारणात खोटं बोलू नये. सार्वजनिक जीवनात काम करताना कोणाची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी लागले. कुठे काय बोलावे आणि काय बोलू नये याचा विचार राजकारणातील व्यक्तिने करायला हवा असे ते म्हणाले. 

मुलाखतीला सुरवात करताना राज म्हणाले, की ही मुलाखत घेताना मला खूप तणाव आला आहे. इतक्‍या लोकांसमोर अशी मुलाखत झाली असेल असे वाटत नाही. पवार साहेबांना म्हटले, मला दोन मिनीटे बोलू द्या ! मी नेहमीचे प्रश्‍न विचारणार नाही. महाराष्ट्रासमोरचे प्रश्‍न विचारणार आहे. जनरेशन गॅपचं प्रेशर आहे. पुण्यात आहे. आज जेवायला बसलो तेंव्हा सुप्रियाताईंचा फोन आला. त्या म्हणाल्या,"" पेपर फोडू नका '' त्यावर मी म्हणालो, की काही प्रश्‍न मी आणले आहेत. तेच विचारणार असे स्पष्ट केले. सर्वांच्या साक्षीने त्यांनी पवारसाहेबांना विचारले. 

राज यांनी दुसरा प्रश्‍न केल मुल्यधिष्ठित राजकारणाचा ? त्यावर पवारसाहेब म्हणाले, की ज्यावेळी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळी विरोधी बाकावर ज्येष्ठ समाजीवादी नेते एस.एम.जोशी होते. त्यावेळी मी विधानसभेच्या गॅलरीत बसलो होतो. जोशी यांनी नवीन कॉंग्रेस मंत्र्याला तीन लागोपाठ प्रश्‍न केले. ते समाधानकारक नव्हते. तेव्हा यशवंतराव पुढे आले आणि त्यांनी जोशी यांची माफी मागितली. विरोधीबाकावरील सदस्याचा सन्मान करायला हवा हे ते म्हणाले. माझ्या मनावर त्यांच्या विचारांचा पगडा आहे.यशवंतरावांनी आमच्यावर जे संस्कार केले त्याची चौकट आम्ही कधीही मोडली नाही. प्रसंगी कधी राजकीय हल्ले करावे लागतात मात्र समोरच्या मानसाचा सन्मान करावा लागतो. सभ्येतेची चौकट कधी मोडली नाही.'' 

आज मात्र संसदेत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असतील किंवा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी असतील किंवा राहुल गांधी. त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत. ते दुर्दैवी आहेत. जवाहरलाल नेहरूनी देशासाठी योगदान दिले नाही असे कसे म्हणता येईल. अटलबिहारी वाजपेयी प्रत्येक व्यक्तिचा सन्मान करीत. याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. 

राज हे शरद पवार यांना घेऊन व्यासपिठावर आले तेंव्हा उपस्थित श्रोत्यांनी जागेवर उपस्थित राहुन स्वागत केले. प्रारंभी राज ठाकरे यांचा आणि प्रतिभाताई यांचा सत्कार करण्यात आला ."मुक्त संवाद दोन पिढ्यांचा' या कार्यक्रमांतर्गत कृषिमंत्री श्री. पवार यांना "मनसे'प्रमुख राज ठाकरे यांनी बोलते केले. या मुलाखतीविषयी उत्सुकता संपूर्ण राज्याला गेल्या काही दिवसांपासून लागलेली होती. 

यावेळी श्री.पवार यांच्या हस्ते नागराज मुंजुळे, लीला गांधी, विलास कटके, चंदू बोर्डे, हणमंतराव गायकवाड आणि अभिनेते अशोक सराफ यांचा तसेच भारतीय विद्यापिठाला पन्नास वर्षे पुर्ण झाल्याबद्दल विश्वजित कदम आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी योगदान देणारे पी.डी.पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास राजकारणासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com