राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी - अमित शहा

राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी - अमित शहा

नवी दिल्ली : राफेल विमानाच्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचे आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनी देशाची आणि सैन्याची माफी मागावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली. राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करून ते म्हणाले राहुल गांधी यांनी बालिश आरोप करणे थांबवावे असेही त्यांनी सांगितले. 
राफेल करारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत प्रशांत भूषण, यशवंत सिन्हा, अरुण शौरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

न्यायालयाने या आरोपात तथ्य नसल्याचा निर्वाळा दिला असून रिलायन्सला या व्यवहारात सहभागी करून घेण्यातही काही चुकीचे घडले नसल्याचे स्पष्ट केले आहे. या निकालानंतर शहा यांनी विशेष पत्रकारपरिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी कुठल्या पुराव्याच्या आधारे मोदी सरकारवर आरोप केले ते त्यांनी सांगावे असेही शहा यांनी म्हटले आहे. राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षाला संसदेत या विषयावर चर्चा नको आहे त्यांना फक्त या विषयावर राजाकरण करायचे आहे असा आरोपही शहा यांनी केला. न्यायालयाच्या निर्णयाबद्दल कॉंग्रेस पक्ष आज दुपारी 4 वाजता पत्रकारपरिषद घेणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com