मध्यावधी निवडणुकीस आम्हीही तयार : विखे

मध्यावधी निवडणुकीस आम्हीही तयार : विखे

नगर : ""राज्यातील मध्यावधी निवडणुकीचा विषय मूळ विषयाला बगल देण्यासाठी आहे. तथापी, सरकार मध्यावधी निवडणूक घेत असेल, तर आम्ही तयार आहोत,'' असा सूचक इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिला. 
नगर येथील एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ""सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेबाबत अनेक प्रश्‍नचिन्ह आहेत. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देणार आहेत. मात्र, ते बॅंकेच्या नियमात बसते का? रिझर्व्ह बॅंक आणि नाबार्डने हा निर्णय घेतला असता, तर तो मान्य होता. सरकार कसे काय शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देऊ शकते? शिवसेनेच्या मागण्यांना सरकारने वाटण्याचा अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे हसू झाले. कर्जमाफीमध्ये तत्त्व:त, अंशत: असे शब्द घातल्याने घोळ झाला आहे. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा आणि शेतमालाला 50 टक्के नफा मिळेल असे धोरण करावे, अशी मागणी करीत आम्ही संघर्ष यात्रा काढली. शेतकऱ्यांची आंदोलन करण्याची मानसिकता संघर्ष यात्रेतून झाली. त्यामुळे शेतकरी संघटनेने श्रेय घेण्याचा विषय येत नाही.'' 
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल साठविण्यासाठी आज कोणतीही व्यवस्था नाही. ती करणे काळाची गरज आहे. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत. तुरीच्या हमीभावाची रक्कम बोनस म्हणून शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी होती. मध्यंतरी सरकारने तूरखरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना तूर दिली. त्यानंतर पुन्हा तूरखरेदी केंद्रांवर घोटाळा झाला. त्यामुळे केवळ शेतकऱ्यांच्या चौकशीचा फार्स करू नये, असेही विखे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com