मराठा आरक्षणास न्यायालयात आव्हान  मिळाल्यास सरकारच जबाबदार: विखे पाटील

धनगर आरक्षणाबाबत केंद्राला शिफारस पाठवण्यासंदर्भात राज्य सरकारची काय भूमिका आहे? 'टिस'चा अहवाल राज्य सरकार कधी सादर करणार? मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार नव्याने विधेयक मांडेल का?सरकारने याची उत्तरे दिली पाहिजेत .-राधाकृष्णविखे पाटील
radha_krushna_vikhe
radha_krushna_vikhe

मुंबई : "सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात सादर न करता केवळ 'एटीआर' मांडून आरक्षणाचे विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे.आमचे म्हणणे आहे की अहवाल सभागृहात मांडा . त्यामुळे भविष्यात दुर्दैवाने या आरक्षणाला न्यायालयात आव्हान मिळाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल", असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

 विधानसभेत आरक्षणासंदर्भात आपली भूमिका मांडताना राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले , "विरोधी पक्षांनी सातत्याने मराठा आरक्षणाबाबतचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधानसभेत मांडण्याची मागणी लावून धरली. पण राज्य सरकारने अहवाल न मांडता फक्त कृती अहवाल आणि विधेयक मांडण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेस आघाडी सरकारने घेतलेल्या मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले गेले आणि नंतर त्यावर सुनावणी राणे समिती, बापट समितीचे अहवाल विधीमंडळात मांडला गेला नसल्याची निरिक्षणे न्यायालयाने नोंदवलेली होती."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com