फसवले तर शेतकरी सरकारच्या उरावर बसेल : राजू शेट्टी 

"आता शेतकऱ्याला फसवलं तर तो सरकारच्या उरावर बसेल, मातीत घालेल याचा बोध सरकारने घ्यावा," असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला.
फसवले तर शेतकरी सरकारच्या उरावर बसेल : राजू शेट्टी 

पुणे : "आता शेतकऱ्याला फसवलं तर तो सरकारच्या उरावर बसेल, मातीत घालेल याचा बोध सरकारने घ्यावा," असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला. 

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या मोर्चानंतर ते `सरकारनामा'शी बोलत होते.  ते म्हणाले, "आगामी निवडणुका शेतकऱ्याच्याच प्रश्नावर होतील, राम मंदिर किंवा बाबरी मशीद हा मुद्दा बाजूला पडेल. शेतकऱ्यांचे प्रश्नच केंद्रस्थानी असतील.''

``आजच्या मोर्चातून शेतकऱ्यांनी इशारा दिलाय जो शेतकऱ्यांना फसवेल त्याला शेतकरी मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. सगळ्याच प्रस्थापित पक्षांना शेतकऱ्यांनी इशारा दिलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राम मंदिरापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले, की देशभरातील शेतकरी सरकारच्या विरोधात एकवटला आहे. शेतकरी आता जो फसवेल त्याला मातीत गाडेल. शेतकऱ्यांना फसवण्याच्या भानगडीत पडू नका. शेतकरी आता पेटून उठला आहे. आजच्या मोर्चाने शेतकऱ्याची शक्ती सरकारला समजली आहे. ही संघटित शक्ती आता प्रस्थापितांच्या विरोधात आपली ताकद दाखवेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com