प्रशांत किशोर यांनीही पडद्यामागे युतीसाठी भूमिका बजावली 

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यात युती व्हावी यासाठी केलेली मध्यस्थी कामाला आली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Thakre-Prashant-Kishor
Thakre-Prashant-Kishor

मुंबई :  राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यात युती व्हावी यासाठी केलेली मध्यस्थी कामाला आली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

प्रशांत किशोर यांनी मातोश्रीवर जाऊन पंधरा  दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट होती असे शिवसेनेच्या गोटातून त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र प्रशांत किशोर युतीबाबत भाजपचे नेते यावेळी मनापासून प्रयत्नशील आहेत ,असा निरोप घेऊन आले होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

भाजप शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी तयार आहे. शिवसेनेच्या काही महत्त्वाच्या मागण्याही मान्य होऊ शकतात. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपच्या ऑफरकडे सकारात्मक पहावे, असा सल्ला प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता, असे समजते. प्रशांत किशोर यांनी आदित्य ठाकरे यांच्याशीही स्वतंत्र चर्चा केली होती. प्रशांत किशोर यांच्यासारख्या तटस्थ आणि महत्वाच्या व्यक्तीने दिलेल्या  निरोपाचा योग्य तो परिणाम झाला 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंशी थेट संपर्क ठेवून होते. शिवसेना-भाजप युतीमध्ये कटुतेचे अनेक प्रसंग आले असतानाही श्री. फडणवीस यांनी श्री. ठाकरे यांच्याशी असलेला संवाद तुटू दिला नव्हता. प्रशांत किशोर यांच्या 'सदिच्छा' भेटीनंतर युतीच्या बोलाचालींना एकदम वेग आला.

गेल्या आठ-दहा दिवसात उद्धव ठाकरे यांचे अनेक वेळा फोनवर अमित शहा यांच्याशी बोलणे झाले. तसेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दोन गुप्त भेटीही महिन्याभरात झालेल्या होत्या.

भाजपतर्फे मोदींचे विश्‍वासू प्रकाश जावडेकर आणि शिवसेनेतर्फे धूर्त व अनुभवी नेते सुभाष देसाई  यांनी शहा-ठाकरे शिखर परिषदेची प्रारंभिक तयारी केली होती असे समजते. प्रसारमाध्यमांशी फारसा संपर्क न ठेवणाऱ्या आणि लो- प्रोफाइल असणाऱ्या या दोन नेत्यांवर युतीच्या  निकषांचा प्रारंभिक आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली होती असे समजते.

उद्धव ठाकरे या काळात मनोहर जोशी, अनिल देसाई, अनिल परब आणि एकनाथ शिंदे आदींशी सल्लामसलत करीत होते. एका बाजूने भाजपवर दबाव वाढविण्याची जबाबदारी खासदार संजय राऊत आणि मंत्री रामदास कदम या दोघांवर शिवसेनेने सोपवलेली होती. युतीच्या घोषणेपर्यंत या दोघांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली.

भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी संपर्क राखून होते.  तसेच उद्धव ठाकरेंशीही सवांद साधून होते . राज्यात गिरीश महाजन, चंद्रकांतदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी श्री. फडणवीस सल्लामसलत करीत होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com