दोन मंत्री असूनही सोलापूरला आठ दिवसांनी पाणी का ? : प्रणिती शिंदे 

.
praniti_shinde_
praniti_shinde_

मुंबई : सोलापूर शहरात दोन-दोन मंत्री असतानाही शहराला आठ दिवसांनी पाणी पुरवठा का होतो? असा प्रश्‍न कॉंग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. 

प्रणिती शिंदे म्हणाल्या, " सप्टेंबरमध्ये उजनी धरण 110 टक्के भरलेले होते. मग आता काही महिन्यातच धरणाचे पाणी जोत्याखाली गेले कसे? राज्यशासनाने आणि संबंधित विभागाने पाणीवाटपाचे योग्य नियोजन केले नाही, त्यामुळे असे घडले आहे. राज्यमंत्रिमंडळात सोलापूरचे दोन-दोन मंत्री असतानाही ही वेळ का आली? अजितदादा पवार जलसंपदा मंत्री असताना उजनीमध्ये अत्यंत कमी पाणी साठा असतानाही तीन दिवसाआड सोलापूरला पाणीपुरवठा होत होता, त्यामुळे नियोजन शून्य कारभारामुळेच ही वेळ आली आहे, असे मला वाटते.'' 

उजनीचे पाणी आता पंढरपूरलाही आषाढीसाठी सोडावे लागणार आहे. या पाण्याचे सरकारने काय नियोजन केले आहे असा प्रश्‍न प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. 

कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांनी पाणी वाटपात भेदभाव केला जात आहे असा आरोप यावेळी बोलताना केला. विधानसभेचे कामकाज पाणी प्रश्‍नावरून तहकूब करावे लागले होते. 

या प्रश्‍नावर निवेदन करताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, " सोलापूरमध्ये अर्धा टीएमसी पाणी पोचावे यासाठी पाच टीएमसी पाणी सोडावे लागते. कारण 100 किलोमीटर अंतर आहे. आता सोलापूर शहराला धरणातून आम्ही थेट पाइप लाइनने पाणी देणार आहोत. हे काम येत्या चार महिन्यात पूर्ण होईल.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com