भाजप-शिवसेना युती ही पाडापाडीसाठी : प्रकाश आंबेडकर

भाजप-शिवसेना युती ही पाडापाडी असल्याचा टोला वंचित बहुजन आघाडीचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत लगावला.
भाजप-शिवसेना युती ही पाडापाडीसाठी : प्रकाश आंबेडकर

अकोला : भाजप-शिवसेना युती ही पाडापाडी असल्याचा टोला वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत लगावला.

ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र गृहित धरल्याने दोन्ही पक्ष एकमेकांच्या जागा कमी कशा करता येतील यासाठीच प्रयत्न करतील. त्याची सुरुवात लोकसभा निवडणुकीतच होईल, असे भाकितही अॅड. आबंडेकर यांनी केले.
 
काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियाना आर्थिक मदत देण्यात आली. त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. आंबेडकर यांनी युतीच्या निर्णयाबाबत बोलताना कोणताही पक्ष मतदारांवर सर्वकाळ हक्क बजावू शकत नाही. त्यांना सर्वकाळ मुर्ख बनविता येत नाही. पाच वर्ष एकमेकांच्या उणिवा काढणारे पक्ष निवडणुकीसाठी पुन्हा एकत्र येत आहे ते केवळ एकमेकांना पाडण्यासाठीच. ज्यांचे आमदार जास्त निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होणार. या सुत्रानुसार आपले संख्याबळ अधिक रहावे यासाठी एक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या विरोधात काम करून पाडापाडीचे राजकारण करणार. त्यासाठीच ही युती झाली असल्याचे अॅड. आंबेडकर म्हणाले. 

आघाडीबाबत २३ ला बोलू
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीबाबतची चर्चा केवळ माध्यमातून होत आहे. याबाबत अॅड. आंबेडकर यांना विचारणा केली असता आघाडीबाबत २३ फेब्रुवारीला बोलू. त्यावेळीच याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगून त्यांनी काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत पुन्हा एकदा मुदत दिली. 
आघाडीच्या नांदेड येथे होणाऱ्या पहिल्या जाहीर सभेला उपस्थिती आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आरोपाबाबत विचारलेल्या प्रश्‍नांना मात्र त्यांनी बगल दिली. 

शस्त्राशिवाय लढाई
पाकिस्तानविरुद्ध भारताने युद्ध करणे संयुक्तिक ठरेल काय, या प्रश्‍नाला उत्तर देताना अॅड. आंबेडकर यांनी पाकिस्तानविरुद्ध शस्त्राशिवाय लढाई करावी, असा सल्ला सरकारला दिला. पाकिस्तानची आर्थिक स्थिती संपूर्ण जगाला माहिती आहे. त्यांना मिळत असलेला आर्थिक मदत थांबवून आणि सर्व बाजूने आर्थिक कोंडी करून ही लढाई लढता येऊ शकते. साैदी अरब पाकिस्तानला देत असलेली मदत थांबविण्यासाठीही भारताने पुढाकार घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. धडा शिकविण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकसारखा पर्याय आहे. मात्र, काश्मिरमधील हल्ला हा भारतीय भूमीवर झाला. तो सीमेपलिकडून झालेला नाही. त्यामुळे थेट युद्धाच्या आंतरराष्ट्रीय परिणामाचाही विचार करावा लागेल, असे अॅड. आंबेडकर म्हणाले.      

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com