विखरणला पाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी 

*
Water-crisis1.
Water-crisis1.

विखरण (धुळे) : विखरण देवाचे (ता.शिंदखेडा, जि. धुळे) येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना गावबंदीचा ठराव आज विशेष ग्रामसभेत मंजूर केला. 

सरपंच दशरथ अहिरे अध्यक्षस्थानी होते. मात्र ठरावाला माजी उपसरपंच विक्रम तायडे यांनी विरोध नोंदवला, तर ग्रामसेविका आर. एस. विसपुते यांनी ठरावाबाबत असहमती नोंदवली. विखरण (देवाचे) येथे सहा महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई आहे. 20 ते 21 दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. या पार्श्‍वभूमीवर विशेष ग्रामसभा सरपंच अहिरे यांनी बोलविली. 

गावभर दवंडीद्वारे ग्रामस्थांना उपस्थितीचे आवाहन केले. विखरणच्या पाणीटंचाईकडे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे गावात 19 नोव्हेंबरला भरणाऱ्या यात्रेत सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांविरोधात निषेध फलक लावून त्यांना गावबंदी करण्यावर चर्चा झाली. 

त्यात बहुमताने ठराव पारित झाला. यावेळी सरपंच अहिरे, उपसरपंच शिवाजी पाटील, माजी सरपंच रामसिंग गिरासे, माजी उपसरपंच विक्रम तायडे, भगवान पाटील, भीमसिंग गिरासे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com