पंतप्रधानांचा आदर करणे ही देशवासियांसाठी शिक्षा : सचिन सावंत 

पंतप्रधानांचा आदर करणे ही देशवासियांसाठी शिक्षा : सचिन सावंत 

मुंबई : पंतप्रधान शिर्डीसारख्या पवित्र धार्मिक स्थळी येऊनही खोटे बोलत आहेत. त्यामुळे पंतप्रधानांचा आदर करणे ही देशवासियांसाठी दिवसेंदिवस शिक्षा ठरू लागली आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

लोकशाही राष्ट्रात देशाचे पंतप्रधानपद हे अतिशय महत्त्वाचे असल्याने देशातील नागरिकांनी त्या पदाचा आदर राखणे हे त्यांचे कर्तव्य असते. परंतु त्या पदावरील व्यक्तीने देखील स्वतःच्या मर्यादा सांभाळून आपल्या कर्तृत्वाने त्या पदाची गरिमा वाढवणे हे त्या व्यक्तीचे ही कर्तव्य असते. दुर्देवाने नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलतात. हिंदू धर्मासह इतर अनेक धर्मात व भारतीय संस्कृतीत असत्य बोलणाऱ्याचा आदर करू नये असेच म्हटले असल्याचेही सावंत यांनी सांगितले. 

नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे बोलताना महाराष्ट्रातील 16 हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत व 9 हजार गावे दुष्काळ मुक्त होण्याच्या मार्गावर आहेत असे जाहीर केले. परंतु राज्यात जवळपास 201 तालुक्‍यातील किमान 20 हजार गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे पंतप्रधान सवयीप्रमाणे खोटे बोलत आहेत हे स्पष्ट आहे. परंतु राज्यात जलयुक्त शिवार योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे हे ही स्पष्ट झाले आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com