पिंपरी महापालिकेचे दोन अभियंते निलंबित

र्तव्यात कसूर केल्याबद्दल पिंपरी महापालिकेच्या दोन अभियंत्यांना आयुक्तांनी आज निलंबित केले. रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्या गैरहजेरी व परिणामी दुर्लक्षामुळे चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे गटाराचे पाणी रहिवाशांच्या घरात घुसले होते. तसेच त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा आला होता.
पिंपरी महापालिकेचे दोन अभियंते निलंबित

पिंपरीः कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पिंपरी महापालिकेच्या दोन अभियंत्यांना आयुक्तांनी आज निलंबित केले. रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्या गैरहजेरी व परिणामी दुर्लक्षामुळे चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे गटाराचे पाणी रहिवाशांच्या घरात घुसले होते. तसेच त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा आला होता.

शहराचे कारभारी असलेले पालिकेतील सत्ताधारी भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या चिंचवड मतदारसंघातील थेरगाव भागात ही आपत्कालीन परिस्थिती उदभवली होती. त्याबद्दल आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी किशोर सोपाना महाजन आणि विजयकुमार चंद्रभान काळे या दोन उपअभित्यांना निलंबित केले. ते ग प्रभागात पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण विभागात कार्यरत होते. मात्र, थेरगावमध्ये अशी कारवाई होताना त्याच दिवशी शहराच्या इतर भागातही अशीच स्थिती उदभवली होती. त्यातही शिवसेनेचे आमदार असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातील खराळवाडी भागात थेरगावपेक्षा बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. तेथील असंख्य घरात गटाराचे पाणी घुसले होते. त्याबद्दल कालच आयुक्तांच्या बंगल्यावर तेथील रहिवाशानी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाही नेला होता. मात्र, त्याची दखलच प्रशासनाने घेतली नाही.

21 तारखेला शहरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी घरात घुसले होते. त्याबाबत दुसऱ्या दिवशी आयुक्तांनी आपल्या बंगल्यावर आपत्ती व्यवस्थापन बैठक बोलावली होती. त्याला हे दोन अधिकारी गैरहजर होते. एवढेच नाही, तर ते विनापरवाना कामावरही हजर नव्हते. त्याबद्दल विचारणा करण्यासाठी त्यांना फोन केला असता त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विनापरवाना गैरहजर राहणे, रजेची कल्पना न देणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे,फोन न उचलणे असा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला आहे.  

पाणीपुरवठा व जलनि:सारण तसेच स्थापत्यची जबाबदारी महाजन आणि काळे यांच्यावर होती. मात्र, आपत्कालीन स्थितीत दोघेही अभियंते विनापरवाना गैरहजर राहिल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनात तसेच पाणीपुरवठा व जल नि:सारण अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. या परिस्थितीला संबंधित दोघेही अधिकारी जबाबदार असल्याचा अहवाल त्यांचे विभागप्रमुख असलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दिला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com