राज्य सरकारने डांबरीकरणासाठी प्लॅस्टिकचा वापर केला अनिवार्य 

उद्यापासून राज्यभर सर्रास प्लॅस्टिक बंदी लागू होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक वस्तू निरुपयोगी ठरून उपलब्ध होणार आहेत. त्याची विल्हेवाट लावण्याचा उपाय राज्य सरकारने शोधला आहे. या प्लॅस्टिक वस्तूंचा वापर राज्य सरकारने आता डांबरीकरणासाठी करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे बंदीमुळे निर्माण होणाऱ्या प्लॅस्टिकचे करायचे काय हा प्रश्‍न निकालात निघणार आहे.
राज्य सरकारने डांबरीकरणासाठी प्लॅस्टिकचा वापर केला अनिवार्य 

पिंपरीः उद्यापासून राज्यभर सर्रास प्लॅस्टिक बंदी लागू होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक वस्तू निरुपयोगी ठरून उपलब्ध होणार आहेत. त्याची विल्हेवाट लावण्याचा उपाय राज्य सरकारने शोधला आहे. या प्लॅस्टिक वस्तूंचा वापर राज्य सरकारने आता डांबरीकरणासाठी करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे बंदीमुळे निर्माण होणाऱ्या प्लॅस्टिकचे करायचे काय हा प्रश्‍न निकालात निघणार आहे. 

पर्यावरण रक्षणासाठी सरकारने तीन महिन्यापूर्वीच राज्यात प्लॅस्टिक बंदी केली होती. मात्र,तीन महिने जनजागृतीसाठी देण्यात आले. त्यानंतर उद्यापासून (ता.23) आता या कायद्याचा बडगा उगारला जाणार आहे. प्लॅस्टिक वस्तूंचा वापर करणाऱ्याला पाच हजार रुपये दंड केला जाणार आहे. मात्र, बंदी घातलेल्या प्लॅस्टिक वस्तूंचे करायचे काय हा प्रश्‍न रहिवाशांसमोर आ वासून उभा आहे. त्या संकलनाची केंद्रे शहरासह राज्यातही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे या वस्तू कचऱ्यातच टाकाव्या लागणार आहेत. 

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी)काल आदेश जारी केला. त्यानुसार बंदी घातल्याने उपलब्ध होणारे निरुपयोगी प्लॅस्टिक आता राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्गाच्या डांबरीकरणात वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तशा सूचना विभागाच्या सर्व मुख्य अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. प्लॅस्टिक वापरल्याने डांबरीकरण कमी किमतीतच होते, असे नाही, तर ते दर्जेदारही होत असल्याचे "सीएसआयआर'या पिंपरी-चिंचवडमधील केंद्रीय रस्ते विकास संशोधन संस्थेला आढळून आले आहे. त्यांच्या अहवालानंतर "पीडब्ल्यूडी'चे उपसचिव खंडेराव पाटील यांनी काल हा आदेश काढला. 

कोरड्या पद्धतीने डांबरीकरणाच्या वरच्या थरात प्लॅस्टिक वापरले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारने त्याचा वापर अगोदरच सुरू केला होता. त्याचा रिपोर्ट केंद्राला चांगला आला. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) त्याचा आढावा घेतला. तसेच प्लॅस्टिकचा वापर डांबरीकरणात करण्याची सूचना केली होती. तसे पत्र "पीडब्ल्यूडी'ने यापूर्वीच काढले होते. मात्र, त्याचा वापर होत नव्हता. तसेच बंदीही लागू झाली नव्हती. त्यामुळे प्लॅस्टिकची उपलब्धताही झाली नव्हती. आता,मात्र, उद्यापासून बंदी लागू होत आहे. परिणामी निरुपयोगी प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात गोळा होणार आहे. म्हणून त्याचा वापर डांबरीकरणासाठी बंधनकारक करण्याचा निर्णय पीएमओ व सीएमओच्या सूचनेनंतर महाराष्ट्र सरकारने आता घेतला आहे. 
राजकारणाच्या बित्तंबातम्यांसाठी डाऊनलोड करा sarkarnama अॅप 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com