जनतेचा राग मतपेटीतून व्यक्त झाला : संजय राऊत

आताच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसचा विजय झाला असे मी म्हणणार नाही. मात्र लोकांचा असलेला राग यातून व्यक्त झाला आहे, असे सांगत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
जनतेचा राग मतपेटीतून व्यक्त झाला : संजय राऊत

नवी दिल्ली : आताच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसचा विजय झाला असे मी म्हणणार नाही. मात्र लोकांचा असलेला राग यातून व्यक्त झाला आहे, असे सांगत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 

सध्याच्या कलांनुसार तीन राज्यांमध्ये भाजपची सत्ता संपून काँग्रेसची सत्ता येण्याची चिन्हे आहेत. अद्याप मतमोजणी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु झाले आहे. राऊत यांनी वृत्तसंस्थांशी बोलताना या निकालांवर आपली प्रतिक्रिया दिली. या निकालांमुळे आत्मपरिक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे त्यांनी मोदी सरकारचे नांव न घेता सांगितले. कुणाला? या प्रश्नावर बोलताना 'समझनेवालोंको इशारा काफी है,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com