तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातही ओबीसीची जनगणना करा 

तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातही ओबीसीची जनगणना करा 

मुंबई ः तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तेथील इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर आता राज्यातील ओबीसींची जनगणना करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा अशी मागणी ओबीसी संघर्ष समन्वय समितीने केली आहे. 

राज्यात असलेल्या ओबीसींना सामाजिक न्याय मिळावा, यासाठी मागील तीन दशकांपासून ओबीसीची जनगणना व्हावी अशी मागणी केली जात आहे, यासाठी अनेक आंदोलने छेडण्यात आली आहेत. विधानमंडळातही या विषयी मागणी करण्यात आली असून त्यावर अद्याप कोणत्याही सरकारने निर्णय घेतला नाही, त्यामुळे आता तेलंगणाच्या धर्तीवर राज्यात ओबीसीची जनगणना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा अशी मागणी समितीचे सरचिटणीस राजाराम पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना केली. 

राज्यात ओबीसी समाज हा 52 टक्केहून अधिक असून त्यांची गणना होत नसल्याने त्यातील अनेक जातींना न्याय मिळू शकला नाही. शिवाय राज्यात आणि देशातही मोठ्या प्रमाणावर शिक्षण, नोकरी, उद्योगाच्या क्षेत्रात बॅकलॉग बाकी असून जनगणना झाली तर नेमकी वस्तुस्थिती समोर येईल यासाठी आता तरी सरकारने बाजूच्या राज्याने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे. 

ओबीसी एनटी पार्टीचे अध्यक्ष संजय कोकरे यांनीही तेलंगणा सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ओबीसी जनगणनेच्या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com