आता कॉंग्रेसची मतदार नोंदणीमध्ये घोळ टाळण्यासाठी समिती

मुंबईच्या सर्व मतदारसंघांतील 20 लाख मतदारांची नावे यादीमधून वगळण्यात आली आहेत. मतदार यादी बनवताना मोठा घोळ झाला आहे. -संजय निरुपम
nirupam-congress
nirupam-congress

मुंबई  : मुंबईतील सर्व मतदार संघांमध्ये 1 सप्टेंबरपासून नवीन मतदार नोंदणी सुरू होणार आहे. या मतदार नोंदणीत घोळ होऊ नये; तसेच खरा मतदार यादीतून वगळला जाऊ नये, यासाठी मुंबई कॉंग्रेसतर्फे समिती स्थापन करण्यात आली आहे.

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या मार्गदर्शना खाली स्थापन केलेल्या या समितीत आमदार नसीम खान, भाई जगताप, माजी आमदार बाबा सिद्दिकी, अशोक जाधव, चरणसिंग सप्रा, मुंबई कॉंग्रेसचे उपाध्यक्ष वीरेंद्र उपाध्याय, मुंबई कॉंग्रेसचे महासचिव संदेश कोंडविलकर यांचा समावेश आहे.

संजय निरुपम म्हणाले की, मुंबईच्या सर्व मतदारसंघांतील 20 लाख मतदारांची नावे यादीमधून वगळण्यात आली आहेत. मतदार यादी बनवताना मोठा घोळ झाला आहे. भाजप सरकारचे हे षड्‌यंत्र आहे.

यामुळे प्रामाणिक मतदाराचा मतदान हक्क हिरावला जात आहे. मंगळवारी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यादीतून वगळलेल्या नागरिकांची नावे जाहीर करण्याची मागणी केली आहे. 1 सप्टेंबरपासून मुंबईत नवीन मतदार नोंदणी सुरू होणार आहे. ही नोंदणी सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई कॉंग्रेसतर्फे समिती स्थापन करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com