पुणे : दुष्काळाच्या झळांनी महाराष्ट्र होरपळतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र दुष्काळ जाहीर करण्याचे नाव घेत नाहीत. आपल्या सरकारमध्ये धमक नाही, अशा शब्दांत हल्ला चढवून राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत शिवसेनेचे प्रमुखप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले.
दुष्काळावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात चालढकल केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही यांनी दिला. निवडणुकांच्या तोंडावर उध्दव यांनी दुष्काळाचा मुद्दा उचलून उपस्थित करून भाजपला अडगळीत ढकल्याचे मानले जात आहे. आशवसने सोडून द्यायची. ती पाळायची नाही. सरकारने फसवणूक केली. त्याचा जाब आता जनता विचारत आङे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धमक दाखवत नाहीत. किती दिवस वाट बघायची? ज्यांच्या हातात झेंडा असतो, त्यांच्याच हाती दांडाही असतो. ते झेंडा उगारतील, असा शाब्दिक हल्ला त्यांनी चढवला.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उमदेपणाची आठवण सांगत त्यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. शिवसेनेचे मंत्री दु्ष्काळी भागाचे दौरे करत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी अभ्यासासाठी अधिक वेळ घेऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला. शेजारच्या कर्नाटक राज्याने दुष्काळासाठीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र आपल्या सरकारला ते जमत नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.