#SangliResult भाजपचा विजय EVM मुळे : नितीन बानुगडे पाटील 

#SangliResult भाजपचा विजय EVM मुळे : नितीन बानुगडे पाटील 

सातारा :सांगली महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 10 ते 12 जागा जिंकण्याचा विश्वास होता. पण अनपेक्षित निकाल लागला. त्याचेच आम्ही आत्मचिंतन करत आहोत. पण हा धनशक्तीचा आणि ईव्हीएमचा विजय आहे, असे मत शिवसेनेचे सातारा-सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांनी "सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केले. 

सांगली महापालिका निवडणूक शिवसेनेने प्रथमच लढली. यामध्ये आम्ही 56 जागावर उमेदवार उभे केले होते, असे सांगून बानुगडे पाटील म्हणाले, आम्ही या निवडणुकीत आमचा पक्ष आणि चिन्ह लोकांपर्यंत पोचविणें महत्वाचे होते. आम्ही पूर्ण ताकद लावली पण नेमके काय चुकले याचेच आत्मचिंतन आम्ही करत आहोत. साधारण 22 जागा रेसमध्ये होत्या, त्यापैकी दहा ते 12 जागा जिंकू असा विश्वास होता. पण निकाल अनपेक्षित लागला.

आम्ही या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलो होतो, पण या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालो आहोत. याचा आम्हाला आगामी विधानसभा निवडणुकीत निश्‍चित फायदा होईल. आम्ही सांगलीत पाय रोवणे महत्वाचे होते. आगामी काळात जनतेने दिलेला कौल मान्य करून 80 टक्के समाजकारण या महापालिका क्षेत्रात करणार आहोत. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्या सुधारण्याचा आगामी काळात प्रयत्न राहील. पण हा धनशक्तीचा आणि ईव्हीएम मशीच्या माध्यमातुन विजय मिळविला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com