नोकरी मिळत नाही तोपर्यंत बेरोजगार भत्ता देण्याची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

नोकरी मिळत नाही तोपर्यंत बेरोजगार भत्ता देण्याची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

औरंगाबाद : केंद्र आणि राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राबवलेली चुकीची धोरणे आणि घेतलेले निर्णय यामुळे दोन कोटी रोजगार उपलब्ध होण्याऐवजी आहे त्यांच्याच नोकऱ्या गेल्या. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशात बेरोजगारीचा सर्वाधीक नीचांक या सरकारच्या काळात गाठला गेला आहे. त्यामुळे तरुणांच्या हाताला जोपर्यंत काम मिळत नाही तोपर्यंत बेरोजगारी भत्ता द्या यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने आज सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत आंदोलन केले. 

देशातील वाढती बेरोजगारी आणि घसरलेला विकासदर या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज (ता.20) विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारचा निषेध म्हणून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत जोरदार घोषणाबाजी देखील केली. विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने, 2014 च्या लोकसभा निवडणुक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी तरूणांना रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र चुकीची धोरण फसव्या योजना आणि सरकारच्या नाकर्तेपणामुळे दोन कोटी तरुणांवर आहे त्या नोकऱ्या गमावण्याची वेळ आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

देशातील विकास दर कधी नव्हे तो 6.1 टक्का एवढा खाली घसरला आहे. त्याचा परिणाम उद्योग आणि व्यवसायांवर झाला असून एनएसओच्या सर्व्हेनूसार गेल्या पाच वर्षात देशभरातील 2 कोटीहून अधिक तरूणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्याचे म्हटले आहे. 

या आहेत प्रमुख मागण्या 
- सत्तेत येणाआधी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन केंद्र सरकारने पूर्ण करावे तसेत त्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर द्यावी. 
- शिक्षक, पोलीस, महसुल व शासनाच्या अन्य विभागातील रिक्त जागा तात्काळ भराव्यात, सुशिक्षित बेरोजगार तरूणांना जोपर्यंत नोकरी मिळत नाही, तोपर्यंत दरमहा बेरोजगारी भत्ता द्यावा. 
- महापोर्टल, महापरीक्षा यंत्रणेद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा बंद करून त्या शासकीय विभागांमार्फत घेण्यात याव्यात. 
- आगामी पोलीस भरती शासनाच्या जुन्या अध्यादेशानूसार करण्यात यावी. 
- पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत खाजगी संस्थांच्या नावे करण्यात येणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या खैरातीचे वाटप बंद करावे. 
- विविध महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये तरुण उद्योजकांना प्राधान्य देऊन लघुउद्योग सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com