राष्ट्रवादीचे आठ खासदार निवडून येतील : शशिकांत शिंदेंचा दावा 

राष्ट्रवादीचे आठ खासदार निवडून येतील : शशिकांत शिंदेंचा दावा 

सातारा : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससह समविचारी पक्षाची आघाडी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे आठ खासदार निवडून येतील. साताऱ्याची जागा शंभर टक्के विजयी होणार आहे. तसेच राष्ट्रवादीचे साताऱ्यातील सर्व आमदारही चांगल्या मतांनी निवडुन येतील, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद आणि कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. 

सातारा शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 2019 च्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस व समविचारी पक्षांची आघाडी होणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या आठ लोकसभेच्या जागा 100 टक्के निवडून येतील. सातारा आणि कोल्हापुरची जागा निवडून येणार ही काळया दगडावरची रेघ आहे.

विधानसभेलाही मला कोरेगावमधून कसलीच अडचण नाही. नुकत्याच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरेगावात झालेल्या मेळाव्यात वरिष्ठांनी गर्दी पाहून माझे कौतुक केले. तसेच तुम्हालाच लोकसभेला उभे करु या, असे चेष्टेने विचारले. वाईत मकरंद पाटील यांच्यासाठीही चांगले वातावरण आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाळासाहेब पाटील यांचेही मतदारसंघ सुरक्षित आहेत. फलटणचे दीपक चव्हाण यांना कसलाही त्रास नाही. तेच पुन्हा रिपीट होणार आहेत. त्यामुळे सातारा जिह्यात पुन्हा राष्ट्रवादीच असणार आहे, असा दावा त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com