भाजपच्या विजयाने दिल्लीतील अराजकतेच्या अंत : शहा

दिल्ली महापालिकांतील भाजपचा विजय हा येणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांच्यंदृष्टीने महत्त्वाचा असून, अराजकतेचा अंत असल्याचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे सांगितले.
भाजपच्या विजयाने दिल्लीतील अराजकतेच्या अंत : शहा

नवी दिल्ली : दिल्ली महापालिकांतील भाजपचा विजय हा येणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांच्यंदृष्टीने महत्त्वाचा असून, अराजकतेचा अंत असल्याचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे सांगितले. 

दिल्लीतील तिन्ही महापालिका निवडणुकांत भाजपने "आप' आणि कॉंग्रेसला चारीमुंड्या चीत करीत अभूतपूर्व यश मिळवले. यानिमित्त आयोजिलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शहा बोलत होते. 

भाजपच्या विजयाचे श्रेय तळागाळातील कार्यकर्त्यांना जाते, असेही त्यांनी नमूद केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या ईव्हीएममधील घोटाळाच्या कथित आरोपाचा शहा यांनी खरपूस समाचार घेत, तो फेटाळला. इतर पक्षांनीही अशाच प्रकारचा केलेला आरोपही निवडणूक आयोगाने बेदखल ठरवला, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ""दिल्लीतील मतदारांना दिलेला कौल हा देशाचा कौल आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशीच देश असल्याचे या निवडणुकीने सिद्ध केले आहे.'' 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com