तुकाराम मुंढे आयुक्त असतील, तर आम्ही नगरसेवकांनी करायते तरी काय? 

शहरात करवाढीचा वाद विवाद जोरात आहे. दहा तास चाललेल्या महासभेने ती फेटाळली. आयुक्त म्हणतात मीच खरा. नगरसेवक म्हणतात आम्ही खरे. याच्याशी संबंधीत पत्रकार, कर्मचारी, नागरीक, नेते, प्रवक्ते सगळे तावातावाने मत मांडतात.
तुकाराम मुंढे आयुक्त असतील, तर आम्ही नगरसेवकांनी करायते तरी काय? 

नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आजपर्यंत बारा हजार नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारींचे निराकरण केले आहे. मात्र करवाढीने ते नगरसेवकांसाठी 'व्हीलन' ठरलेत. लोक समस्या घेऊन नगरसेवकांकडे आले नाही तर त्यांनी करायचे तरी काय? हा त्यांचा प्रश्‍न आहे. हे मात्र खरे आहे लोक थेट मुंढेंकडे जाऊ लागल्याने अडचण स्वाभाविक आहे. यावर सामोपचाराने तोडगा निघणार नाही काय? हा प्रश्‍न शहरवासीयांना पडला आहे. 

शहरात करवाढीचा वाद विवाद जोरात आहे. दहा तास चाललेल्या महासभेने ती फेटाळली. आयुक्त म्हणतात मीच खरा. नगरसेवक म्हणतात आम्ही खरे. याच्याशी संबंधीत पत्रकार, कर्मचारी, नागरीक, नेते, प्रवक्ते सगळे तावातावाने मत मांडतात. यात मुख्य गोष्टीचा विसर पडतो तो म्हणजे महापालिका चालते ती नगरविकास विभागाच्या अंतर्गत. हा विभाग मुख्यमंत्री फडणवीसांच्या अखत्यारीत. जिल्ह्याचे पालकमंत्री सत्ताधारी पक्षाचे. शहरात 66 नगरसेवक, सर्व पदे, तीन आमदार या पक्षाचे आहेत. आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती घेतली तर आंदोलन, वाद-विवाद, महासभा या कशाचीही गरजच नाही. हा सोपा पर्याय सोडुन शहराला का वेठीस धरले जाते आहे, हे अनाकलनीय आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com