नवीन कारागृहांची जयंत पाटील यांची मागणी

नवीन कारागृहांची जयंत पाटील यांची मागणी

मुंबई : महाराष्ट्रातील तुरूंगांची मर्यादा संपली आहे. एका कारागृहात संख्येपेक्षा जास्त कैदी आहेत. सरकारचे कारागृह व्यवस्थापणाकडे लक्ष नाही. सरकार नव्या कारागृहाची निर्मिती करेल का, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभा गटनेते जयंत पाटील यांनी विचारला. मंजुळा शेट्ये प्रकरणावर आज विधानसभेत लक्षवेधी सुचनाद्वारे चर्चा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. 

जयंत पाटील म्हणाले, की महाराष्ट्रातील तुरुंगांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. लैंगिक अत्याचार व प्रचंड मारहाण केल्याने मंजुळा शेट्ये यांचा म्रुत्यू झाला, असे पोस्टमोर्टेम अहवालात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्याची मान शरमेने खाली गेली आहे. पोलिस दलातील लोकांनी आपल्या सहकाऱयाला मारहाण करणे हे अत्यंत चुकीचे आहे. मंजुळा शेट्ये यांची वागणूक चांगली असल्याने त्यांची वार्डन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जर सहकर्मचाऱ्यांसह अशी घटना घडत असेल तर इतर महिला कैद्यांचं काय ? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, की या सगळ्या गोष्टींची निष्पक्षपणे चौकशी व्हायला हवी व दोषींवर कडक कारवाई केली जावी. महिला कैद्यांचे जेलमध्ये प्रचंड हाल केले जातात. महिलांना झोपण्यासाठी जागा नाही. मासिक पाळी दरम्यान त्यांना गरम पाणी दिलं जात नाही, सॅनिटरी पॅड्सची सोय केली जात नाही. सरकार त्यासाठी काय पाऊलं उचलणार ? मंजुळा शेट्ये प्रकरणात ज्या महिला कैद्यांनी छतावर चढून आंदोलन केले, त्या महिला कैद्यांवर प्रशासनाने गंभीर असा तुरुंगातून पळून जाण्याचा गुन्हा दाखल केला आहे. हे गंभीर गुन्हे परत घेण्यात यावे, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. 

या लक्षवेधीवर चर्चा करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले, की राज्यातील अनेक तुरूगांमध्ये महिलांवर लैगिक आत्याचारा होत असतात. माझ्याकडे याचे पुरावे आहेत. हवे असल्यास आपणाकडे देतो. कारागृहात पुरुष अधिकाऱ्यांकडून महिलांना चुकीची वागणूक मिळते, असे अनेक प्रकार राज्यात घडत आहे, हे मी पुराव्यानिशी सांगू शकतो. सरकारने एखाद्या महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणांची चौकशी करावी. मंजुळा शेट्ये प्रकरणातील अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी इतर कर्मचारी प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली. 

या लक्षवेधीवर उत्तर देताना रणजित पाटील म्हणाले, " अजितदादांनी सांगितलेल्या सर्वच गंभीर प्रकारांची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. मंजूळा शेट्टीला मारहाण झालेली आहे, 17 ठिकाणी जखमा झाल्या आहेत. तिच्या मत्यूबद्दल कोर्टात सादर केलेल्या पत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल त्या डॉक्टरांना निलंबित करण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com