घोटाळ्यावरील प्रश्नांना सभागृहात बंदी

घोटाळ्यावरील प्रश्नांना सभागृहात बंदी

मुंबई : विविध माध्यमांतून समोर आलेले सरकारचे घोटाळे दडपण्याचा प्रयत्न राज्य सरकारमार्फत सुरू आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंधारणमंत्री राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्या खात्यांत झालेल्या नियमबाह्य कामासंदर्भात सभागृहात चर्चा व्हावी यासाठी लक्षवेधी सूचना किंवा इतर आयुधांच्या माध्यमातून मागणी केल्यानंतरही सरकारकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या सरकारकडून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी `सरकारनामा'शी बोलताना केली.

गतिमान आणि पारदर्शी असा टेंभा मिरविणा-या सरकारच्या घोटाळ्यांची मालिका मागील काही दिवसांत माध्यमातून समोर आली आहे. विविध मतदारसंघात वितरित करण्यात आलेल्या निधीबाबत, जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या नियमबाह्य कामाबाबत, पीकविम्याचे पैसे परत न मिळाल्याबाबत आणि दानवे यांच्या नियमबाह्य शिक्षण संस्था यांसारख्या घोटाळेबाज विषयावर लावलेल्या एकही प्रश्न सभागृहात आला नाही. त्यामुळे घोटाळ्याच्या प्रश्नांना सभागृहात बंदीच कऱण्यात आल्याची टीका आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे. फक्त कोटा पूर्ण करण्यासाठी थातूर-मातूर आणि सभागृहात आक्रमकपणे न बोलणा-या आमदारांच्याच लक्षवेधींना किंवा प्रश्नांना स्थान दिले जात आहे. त्यामुळे हे घटनाबाह्य काम करणारे सरकार असल्याचेही सत्तार म्हणाले. एवढेच नाही तर सरकारच्या विरोधात आवाज उठवणा-यांवर आमदारांवर निलंबणाच्या कारवाई करणे, त्यांच्या मतदारसंघाचा निधी आडवून धरणे यांसारखे सर्व प्रयोगही या सरकारमार्फत केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com