भाजपला पूरक असे एमआयएमचे काम : विखे पाटील

भाजपला पूरक असे एमआयएमचे काम : विखे पाटील

पुणे : राज्यात मुस्लीमांचे प्रतिनिधीत्व करीत असल्याचे सांगत "एमआयएम' अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टीला एक प्रकारे पूरक काम करीत असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी पुण्यात केली.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत "एमआयएम'ला यश मिळाले. मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांना अपयश आले असून "एमआयएम'चा प्रभाव राज्यात कमी झाला आहे, असे त्यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची आघाडीबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षात जागावाटपावरून कोणताही तिढा निर्माण होणार नाही, असे विखे पाटील यांनी सांगितले.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत छोट्या पक्षांना सामावून घेण्यात येणार असून त्याबाबत राज्यातील काही पक्षांशी चर्चा देखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि "एमआएम'चे अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी हे दोघे एकत्र आले आहे. या प्रश्नावर ते म्हणाले की, "" प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे एकत्र आल्याची माहिती प्रसार माध्यमातून समजली. आंबेडकरांना आघाडी घेण्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. 

आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पावरून सध्याच्या सताधारी पक्षाकडून हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र त्यांच्या त्या आरोपांचे पुढे काय झाले, असा प्रश्‍न उपस्थित केला. केवळ सत्तेत येण्यासाठी अशाप्रकारचे आरोप करण्यात येत होते, असे त्यांनी सांगितले. भाजपा राज्यात सत्तेत येऊन चार वर्षांचा कालावधी झाला. या सरकारने सिंचन प्रकल्पावर किती काम केले याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी विखो-पाटील यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com