भाजपला आता इंग्लंड, अमेरिकेत सरकार हवे आहे काय? : यशवंत सिन्हा 

"चार वर्षापूर्वी ज्या प्रश्‍नांसाठी जनतेने नरेंद्र मोदींना सत्ता दिली ते सर्व प्रश्‍न आजही कायम आहेत. केंद्रात, राज्यात, महापालिकांत देखील भाजपला सत्ता मिळाली. तरी ही स्थिती असेल तर जनतेचे प्रश्‍न सोडवायला भाजपला आता काय इंग्लंड, अमेरिकेची सत्ता हवी आहे काय?'' असा खोचक प्रश्‍न भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी विचारला आहे.
भाजपला आता इंग्लंड, अमेरिकेत सरकार हवे आहे काय? : यशवंत सिन्हा 

नाशिक : "चार वर्षापूर्वी ज्या प्रश्‍नांसाठी जनतेने नरेंद्र मोदींना सत्ता दिली ते सर्व प्रश्‍न आजही कायम आहेत. केंद्रात, राज्यात, महापालिकांत देखील भाजपला सत्ता मिळाली. तरी ही स्थिती असेल तर जनतेचे प्रश्‍न सोडवायला भाजपला आता काय इंग्लंड, अमेरिकेची सत्ता हवी आहे काय?'' असा खोचक प्रश्‍न भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी विचारला आहे.  

माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सद्य राजकीय स्थिती, आगामी निवडणुका, तिसरा मोर्चा, भाजपचे अंतर्गत राजकारण याविषयी 'सरकारनामा' प्रतिनिधीशी झालेल्या चर्चेत विस्ताराने विवेचन केले. उत्तर प्रदेश सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात रामजी हा शब्द जोडला आहे. यावर ते म्हणाले, "डॉ. आंबेडकर यांचे कर्तुत्व मोठेच आहे. सबंध देश त्यांचा आदर करतो. त्यांचे पूर्ण नाव घेतांना त्यात रामजी नाव येतेच. मात्र, आता काही लोक रामजी नाव जोडण्याचा खटाटोप करीत आहे. हे करणारे अपिरपक्व राजकारणी वाटतात. ज्यांनी ही कल्पना मांडली त्यांची तर मला कीव येते.'' लोकांना रोजगार नाही, पोटात अन्न नाही, समाजात प्रतिष्ठा नाही, गरीबीने त्रस्त आहेत त्यांचे प्रश्‍न यातुन सुटणार आहेत काय?. असे जुमले केल्याने राजकीय अपयश झाकता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले, ''केम्ब्रिज ऍनालिटीका कंपनीने निवडणुकांत सोशल मिडायीचा वापर केला. सोशल मिडायाचा निवडणुकांसाठी वापर करणे गैर नाही. मात्र, तसे करतांना भारतीय नागरीकांचा डेटा परदेशी कंपन्यांना दिला गेला, ही घटना गंभीर आहे. सुरक्षेची काळजी आवश्‍यक आहे. या प्रकरणात आता काँग्रेस - भाजपमध्ये आरोप, प्रत्यारोप होत आहेत. यामध्ये सत्य झाकले जात आहे किंवा दडपण्याचा प्रयत्न होत आहे. परदेशी संस्थांकडे भारतीय नागीरकांची माहिती जाणे अत्यंत गैर व घाटक आहे. त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. त्यामुळे यातील सत्य बाहेर काढण्यास व दोषींना शिक्षा देण्यासाठी न्यायालयामार्फत त्याची स्वतंत्र चौकशी करणे हाच पर्याय आहे."

"देशाच्या विविध राज्यात काँग्रेस, भाजप व्यतिरिक्त विविध प्रादेशिक राजकीय शक्ती आहेत. त्यामुळे तिसऱ्या आघाडीसाठी ते प्रयत्न करीत असतात. त्याची शक्‍यता लवकरच स्पष्ट होईल. राममंदिर हा वापरुन गुळगुळीत झालेला विषय आहे. त्यामुळे त्याचा आता उपयोग होणार नाही. केंद्रात, राज्यात भाजपचेच सरकार आहे. चार वर्षापूर्वी जे प्रश्‍न होते ते आजही काम आहेत. त्यामुळे केवळ केंद्र सरकारच नव्हे तर राज्य सरकारही त्याला जबाबदार असल्याने निवडणुकीत दुप्पट 'अँटीइनकमबन्सी'ला आम्हाला (भाजपला) सामोरे जावे लागेल," असेही सिन्हा यांनी सांगितले. कर्नाटक नंतर मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांत निवडणुका आहेत. त्यानंतर थेट लोकसभेच्या निवडणुका असल्याने देशातील जनता आता लवकरच 'इलेक्‍शन मोड' मध्ये जाईल. त्यामुळे केंद्र सरकारला काहीही करण्याची संधी उरलेली नाही असे सुचक वक्तव्य त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com