देशाचा राजा अर्थात मोदी सरकार कायम : भेंडवळच्या घडमांडणीचा 'अंदाज'

या हंगामात पिक आणि पाऊस समाधान कारक राहील, देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान कायम राहणार असून दुष्काळी परिस्थिती फारशी उद्भवणार नाही, असे अंदाज भेंडवळच्या घटमांडणीने दिले. शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष वेधणारी बहुचर्चीत भेंडवळची घटमांडणी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी (ता.18) सायंकाळी करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी सुर्योदयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज वाघ यांनी अंदाज व्यक्त केले.
देशाचा राजा अर्थात मोदी सरकार कायम : भेंडवळच्या घडमांडणीचा 'अंदाज'

खामगाव : या हंगामात पिक आणि पाऊस समाधान कारक राहील, देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान कायम राहणार असून दुष्काळी परिस्थिती फारशी उद्भवणार नाही, असे अंदाज भेंडवळच्या घटमांडणीने दिले.  शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष वेधणारी बहुचर्चीत भेंडवळची घटमांडणी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी (ता.18) सायंकाळी करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी सुर्योदयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज वाघ यांनी अंदाज व्यक्त केले. 

गेल्या 350 वर्षापासून भेंडवळची घटमांडणी करण्यात येते. पुर्वी हवामान खाते, पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नसतांना बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळमधील वाघ वंशाजे पुर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरलेल्या भेंडवळ घटमांडणीची सुरूवात केली. आणि ती परंपरा या वाघ कुटुंबियाने आजही जपली आहे. विधिवत पूजन करून ही घटमांडणी केली जाते. 

अक्षयतृतीयेला संध्याकाळी पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज आपल्या अनुयायांसह चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत गावाशेजारील शेतात घटमांडणी केली होती. गोल घट करून घटाच्या मधोमध खड्डा करण्यात आला. यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्याचे प्रतिक म्हणून चार मातीची ढेकळे व त्यावर घागर ठेवण्यात आली. या घागरीवर पापड, पुरी, सांडोळी, कुरडई, करंजी, भजा आणि वडा अशा प्रतीकात्मक खाद्य पदार्थांची मांडणी केली होती. घटात अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, कपाशी, मटकी, मुंग, उडीद, करडी, तांदुळ, जवस, तीळ, मसुर, हरभरा, वाटाणा, भादली इत्यादी अठरा प्रकारच्या धान्याची मांडणी करण्यात आली होती. धान्य आणि खाद्य पदार्थांची पाहणी करून अंदाज व्यक्त करण्यात आले. 

येत्या हंगामात खरीपातील ज्वारी, मूग, बाजरी, जवस ही पिके व्यवस्थित येतील असे सांगण्यात आले. तर कपाशी, तूर, उडीद, तीळ, भादली, लाख, वाटाणा, ही पिके कमी अधिक प्रमाणात येतील, असा अंदाज वर्तवण्यात आला. रब्बीत गहू, हरभरा ही पिकेही सामान्य सांगण्यात आली. पावसाचा अंदाज देताना जूनमध्ये पाऊस सुरु होणार असला तरी पेरण्या जुलैत होतील, जूनपेक्षा जुलैमध्ये अधिक पाऊस पडेल व त्यानंतर आॅगस्टमध्ये अधिक पाऊस पडणार आहे, सप्टेंबरमध्ये साधारण पाऊस असेल असे सांगण्यात आले. 

'शिवाय लहरी स्वरुपातील पाऊस होईल. चार महिन्यांच्या काळात साधारण स्वरुपातील पाऊस होईल, देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान कायम राहणार असला तरी त्याला चिंता असेल. आर्थिक स्थिती मजबूर राहील. यंदा मोठी नैसर्गिक आपत्ती नसेल. देशाचे शत्रू त्रास देतील; परंतु संरक्षण मजबूत असल्याने कुठलाही धोका होणार नाही,' असाही एक अंदाज वर्तविण्यात आला. शेतमालाच्या भावात तेजीमंदीचा अंदाजही मांडण्यात आला. या घटमांडणीचे अंदाज एकण्यासाठी हजारो शेतकरी पहाटेपासून उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com