आठ दिवसात गुन्हे मागे घेण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी

आठ दिवसात गुन्हे मागे घेण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सगळीकडे शांततेत आंदोलन करण्यात आले आहे. मात्र घनसावंगी येथे काही समाज कंटकांनी मोर्चात घुसुन दगडफेड केली. गुन्हे मात्र मराठा समाजाच्या तरुणांवर आणि मोर्चा आयोजकांवर दाखल केले आहेत. हे गुन्हे ता.8 ऑगस्टापर्यंत मागे घेतले नाही, तर निर्माण होणाऱ्या परिणामास लोकप्रतिनिधि आणि प्रशासन जबाबदार असेल, असे मराठा क्रांती मोर्चाच्या सोमवारी (ता.30) आयोजीत पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एक ऑगस्टपासून शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा येथे बेमुदात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आठ ऑगस्टपासून मराठा आमदार आणि खासदार यांच्या निवासस्थानांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. घनसावंगी येथे झालेली दगडफेक ही मराठा समाजातील तरुणांनी केलेली नाही. पोलिस प्रशासन आणि न्यायदंडाधिकारी यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर फुटेज चेक करावे, त्यात जर दगडफेक करताना कोणी अढळ्यास त्यावर कारवाई करा. मात्र विनाकारण दाखल केले गुन्हे तत्काळ मागे घ्या अशी मागणी ही आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com