सरकार कर्जवसुली एजंट आहे काय ? 

सरकार कर्जवसुली एजंट आहे काय ? 

मुंबई : सरकारी धोरणांमुळे शेतकरी आत्महत्यांना प्रवृत्त झाला आहे. राज्यातील तीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकार पुरस्कृत दंगल आहे. साडेपाच लाखाच्या पीककर्जाला साडेतीन लाख भरायला सांगून दीड लाखाची कर्जमाफी म्हणजे सरकार कर्जवसुली एजंट झालेय का ? असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी केला आतापर्यंत धार्मिक कट्टरता पाहिली. आता शेतकऱ्यांचा कट्टरवाद पहा असा इशारा देतानाच कडू यांनी फडणवीस सरकारवर कडवट टीका केली. 

सत्ताधारी पक्षाकडून नियम 293 अन्वये उपस्थित कर्जमाफीच्या प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना कडू बोलत होते. 

कडू म्हणाले, "" सर्व राजकीय पक्ष शेतकऱ्यांचे मारेकरी आहेत. दहा हजारापेक्षा जास्त भाव असलेली तूर यंदा हजार रुपयांनी खरेदी केली. शेतकऱ्यांची एकही अडीज लाखाचे नुकसान झाले. शेतकरी कर भरत नाही असे आरोप शहरी लोक करतात. मग टॅक्‍टरसाठी डिझेल- पेट्रोल आणि वस्तुंच्या खरेदीवर कोण कर भरत ते सांगा ? तुरीची आयात करुन त्यावर स्टॉक लिमीट लावायचं म्हणजे छातीवर हत्ती ठेऊन पळ म्हणण्यासारखे आहे. स्वामिनाथन समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा, शेतमाला भाव द्या, पाच लाखाचे पीक कर्ज असताना साडेतीन लाख भर म्हणायचं आणि दीड लाख देऊ असे सांगणारे सरकार म्हणजे बॅंकेचे एजंट आहे का ? '' 

2016-17 वर्षाच्या पीक कर्जाचा कर्जमाफीत समावेश करा, पुर्नगठीत कर्जाचा समावेश थकीत कर्जात करा, पॉलीहाऊसच्या शेतीच्या कर्जाचा कर्जमाफीत समावेश करा, परीपुर्ण कर्जमाफीची अंमलबजावणी झाली नाही, तर येत्या 14 ऑगस्टपासून चक्का जाम करुन 15 ऑगस्टरोजी मंत्र्यांना झेंडावंदन करून देणार नाही असा इशारा कडू यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com