पहिले वर्ष विरोधक म्हणून काय काम करायचे हे कळतच नव्हते - पृथ्वीराज चव्हाण

PRUTHVIRAJ-CHAVAN-
PRUTHVIRAJ-CHAVAN-

मुंबई :  " सत्ता गेल्यानंतर पहिले एक वर्ष कळतच नव्हते की विरोधक म्हणून काय काम करायचे असते. त्यामुळे मागील काळात आम्ही आक्रमक नव्हतो. परंतू यापुढे सरकारची कोंडी करणार आहोत हे मात्र नक्की आहे , "असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार  परिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले . 


गेल्या काही दिवसापासून तुम्ही विधानसभेत आक्रमक झाले आहात नक्की काय कारण आहे.  या प्रश्नाला उत्तर देताना श्री . चव्हाण यांनी बोलत होते . 

विरोधी पक्ष नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्याच बरोबर पक्षातही मतमतांतर असल्याने सभागृहात मेळ नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद पदरात पाढून घेण्यासाठी आपण आक्रमक झाले आहात का?

या प्रश्नांवर खुलासा करताना चव्हाण म्हणाले की ,

" माझ्या पक्षश्रेष्ठींवर विश्वास आहे. माझ्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणूकीत मिळालेल्या अपयशाची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे. त्याचबरोबर सर्वच पदे मला मिळावी यासाठी माझा कधीही आग्रह राहिला नाही. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी विरोधी पक्ष नेत्याची निवड केली आहे, त्या प्रक्रियेत मी सुध्दा होतो. त्यामुळे मी पदासाठी किंवा पोकळी भरून काढण्यासाठी आक्रमक झालो नाही . " 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com