भाजप सरकार "चले जाव' : मधुकर पिचड 

सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची थट्टा केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप सरकार "चले जाव'चा नारा देणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी सांगितले.
 भाजप सरकार "चले जाव' : मधुकर पिचड 
भाजप सरकार "चले जाव' : मधुकर पिचड 

नगर : सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची थट्टा केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप सरकार "चले जाव'चा नारा देणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी सांगितले. 

निळवंडे धरणाच्या जलपुजन कार्यक्रमात त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकारच्या अडमुठ्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे जीव जात आहेत. त्यांना वाचविण्यासाठी आता पुढे यावे लागेल. निळवंड्याचे श्रेय घेण्यावरून भांडणे सुरू आहेत. बाळासाहेब थोरात सोडले, तर कुणीही मदत करीत नाहीत. धरण भरल्यावर जसा आनंद होतो, तसाच ज्यांचे संसार त्यात बुडाले, तांच्या डोळे पुसण्याचे काम कोणी करीत नाही, असे पिचड म्हणाले. 
अकोले तालुक्‍यातील जनतेची जमीन धरणात गेली आहे. त्यामुळे त्या पाण्यावर हक्कही तालुक्‍यातील जनतेचा पहिला पाहिजे. आम्हाला पाणी न देता पळवून नेणाऱ्यांना आम्ही धडा शिकवू. आज जितक्‍या आनंदाने जलपूजन करतो, तितक्‍याच आक्रमकपणे आंदोलनही करू, असा इशारा पिचड यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com