ग्रामपंचायत निवडणूका -चावडी वाचनात लटकली कर्जमाफी 

shetkar-
shetkar-

मुंबई   : राज्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमुळे शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला विलंब होत असून चावडी वाचनाच्या भोवऱ्यात या गावांची कर्जमाफी लटकण्याची भिती आहे. 

शनिवारी ता.7 व 16 ऑक्‍टोबरला राज्यात 7800 हून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकांची आचारसंहिता व प्रक्रियेत प्रशासन व्यस्त असल्याने कर्जमाफीच्या लाभार्थींच्या यादीचे चावडी वाचन होत नाही. गावांत निवडणूक सुरू असल्याने ग्रामसभाही घेता येत नसल्याने चावडी वाचन होत नाही. त्यामुळे, या गावांना दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्‍यता दिसत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कर्जमाफीसाठी सध्या राज्य सरकारकडे शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. या नोंदणीची पडताळणी सुरू असून या आठवड्यात प्रत्यक्ष लाभार्थींच्या याद्या तयार होण्याचे संकेत आहेत. मात्र, अनेक बॅंकांनी संबधित जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या सरकारकडे पाठवल्या नसल्याचे कारणही दिले जात आहे.

 त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांतील बॅंकांकडून कर्जदार शेतकऱ्यांच्या यादी सरकारकडे येत नाहीत तोपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी करता येणार नसल्याचे सहकार विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. 

ग्रामपंचायत निवडणुकांमुळे कर्जमाफीची अंमलबजावणी दिवाळीनंतरच होण्याची शक्‍यताही सूत्रांनी वर्तवली. त्यामुळे, कर्जमाफीसाठी गेले चार महिने डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना या दिवाळीतही कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्‍यता नाही, असे मानले जाते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com