नाईक कुटुंबीयांच्या त्रासामुळे कॉँग्रेसला रामराम : भरत गावित यांचा राजकीय वार 

सुरूपसिंग नाईक यांनी माझ्याऐवजी के. सी. पाडवींना उमेदवारी दिली. नाईक कुटुंबीयांनी सतत आम्हाला त्रास दिला, खोट्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच मी कॉंग्रेसला रामराम केला असून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नाईक कुटुंबीयांच्या त्रासामुळे कॉँग्रेसला रामराम : भरत गावित यांचा राजकीय वार 

नंदुरबार : माझे वडिल कॉंग्रेसचे एकनिष्ठ नेते माणिकराव गावित यांनी स्वतःला नव्हे, जिल्ह्यात कॉंग्रेसला वाढविले, पण लोकसभा निवडणुकीवेळी जेव्हा त्यांनी माझ्यासाठी उमेदवारी मागितली तेव्हा मात्र कॉंग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला दूर ठेवले, एकटे पाडले. त्यावेळेचे नेते सुरूपसिंग नाईक यांनी माझ्याऐवजी के. सी. पाडवींना उमेदवारी दिली. नाईक कुटुंबीयांनी सतत आम्हाला त्रास दिला, खोट्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच मी कॉंग्रेसला रामराम केला असून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकारांशी वार्तालापप्रसंगी गावित उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, प्रकाश चौधरी, अनिल वसावे आदी व्यासपिठावर उपस्तित होते. चौधरी यांनी पक्षाच्या आगामी कामकाजाविषयी माहिती देत पत्रकारांशी चर्चा केली, त्यानंतर गावितांना पक्षप्रवेशाविषयी विचारले असता त्यांनी नाईक कुटुंबियांवर राजकीय वार करीत लोकसभा निवडणूक व त्यानंतर झालेले पक्षांतगर्त राजकारण प्रथमच उघडपणे मांडले. 

गावित म्हणाले, ''नवापूर तालुक्यात गेल्या पन्नास वर्षात कॉंग्रेसची पाळेमुळे घट्ट रोवण्यासाठी आमच्या गावित परिवाराचे मोठे योगदान आहे. माझे वडिल माणिकदादांनी सतत नऊ वेळा संसदेत येथील प्रतिनिधित्व केले. ज्येष्ठ सदस्य म्हणून देशाचे प्रतिनिधित्वही केले. असे असताना लोकसभा निवडणुकीवेळी त्यांना थांबा असे सांगण्यात आल्यानंतर साहजिकच मुलाला संधी मिळावी ही त्यांची मागणी स्वाभाविक होती. पक्षाने मात्र विश्‍वासात न घेता तेव्हाचे नेते सुरूपसिंग नाईक यांनी के. सी. पाडवी यांना उमेदवारी दिली. नेत्यांनी विश्‍वासात घेऊन भरतला आम्ही संधी देऊ असे सांगितले असते तरी आम्ही विचार केला असता, मात्र तसे काहीही न करता पक्षाने आम्हाला बाजूला केल्यासारखे केले.''

ते पुढे म्हणाले, ''लोकसभा निवडणुकीतही कोणतीही जबाबदारी दिली नाही, तरीही आम्ही पक्षाचे प्रामाणिकपणे काम करीत तालुका कॉंग्रेसमयची स्थिती कायम ठेवली. पक्षाच्या नेत्यांनी याकडेही लक्ष न दिल्याने आम्ही नाराज होता. एकटे पडलो होता. या साऱ्यामागे पक्षाचे आमचे तेव्हाचे नेते सुरूपसिंग नाईक आणि त्यांचे पुत्र शिरीषकुमार नाईक हेच आहेत. त्यांनी आम्हालाल सतत त्रास दिल्यानेच मी कॉंग्रेसला रामराम करीत आहे.''

तेव्हापासून चर्चा सुरू होती
लोकसभा निवडणुकींनंतर भाजपचे ओबीसी मोचार्चे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष आणि आताचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्याशी माझी चर्चा सुरू होती. आमचे मैत्रीचे जुने संबंध होते. त्यांनीही मला तुमच्यासारखे तरूण नेते भाजपमध्ये आल्यास आमची नवापूरमधील ताकद वाढेल असा विनंतीवजा सल्ला दिल्यानंतर पूर्ण विचाराअंती मी कॉंग्रेस सोडत भाजपमध्ये आलो आहे. नवापूरमधून भाजपची उमेदवारीबाबत पक्षाला सांगेनच पण पक्ष आदेश देईल तोही मी पाळेन, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com