नारायण राणेंना  श्रेय नको म्हणून उद्धव ठाकरे रिफायनरी विरोधात फडणवीसांना भेटले !      

कोकणात शिवसेना राजकीय पक्ष म्हणून भक्कम आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा तीन जिल्ह्यात मिळून 2 खासदार, 7 आमदार अशी त्यांची मोठी ताकद आहे. मात्र रिफायनरीविरोधी वातावरणामुळे त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
thakrey-Fadanvis
thakrey-Fadanvis

मुंबई  : कोकणातील  राजापूर परिसरात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प रद्द व्हावा यासाठी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे जाऊ नये म्हणून शिवसेनेने  प्रकल्प रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांच्या दरबारी गुरुवारी केल्याचे समजते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या संदर्भात सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे  गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याची  माहिती सूत्रांकडून मिळत आहेत.    

      रत्नागिरी मधील राजापूर तालुक्यातील 14 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 16 गावांमध्ये उभारल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. शिवसेना सत्तेत असल्याने ग्रामस्थाच्या बाजू राहणार की सरकारच्या यावरून संभ्रम आहे. मात्र , जनतेच्या बाजूने उभे राहत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मात्र प्रकल्पविरोधी भूमिका जाहीर केल्यानंतर राणे यांच्या स्वाभिमान पक्षाला कोकणात पाय रोवण्याची संधी मिळू लागली होती.

   माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ग्रामस्थांच्या बाजूने आंदोलनात उडी घेत हा प्रकल्प रद्द करण्यासाठी मी तुमची मुख्यमंत्र्यांबरोबर भेट घेऊन देतो, असे  आश्वासन प्रकल्पविरोधी ग्रामस्थांच्या समितीला दिल्याची  कुणकुण  सेनेला लागली. ही बाब सेना  खासदार विनायक राऊत यांनी  उद्धव ठाकरे  यांच्या कानी घातली. आपण पुढाकार घेतला नाही तर राणे यांना श्रेय मिळेल आणि त्याचा मोठा फटका आगामी निवडणुकांमध्ये सेनेला बसू शकतो, असे राऊत यांनी सांगितल्यामुळे शेवटी तातडीने फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यास उद्धव तयार झाल्याचे समजते.          

         रिफायनरी प्रकल्पामुळे  राजापुरमधील 14, तर देवगडमधील 2 गावे विस्थापित होणार असून कोकण परिसरातील नैसर्गिक साधन संपत्तीवर त्याचा मोठा घातक परिणाम होणार असल्याची ग्रामस्थांची भावना आहे. शिवसेनेबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजीचाही सूर आहे. शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई हे प्रकल्पाच्या बाजूने आहेत त्यामुळे स्थानिक शिवसेना पुढारी हे प्रकल्प विरोधी आंदोलनात असल्याचे सांगत असले तरी नेमके कोण कुठे हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

 कोकणात शिवसेना राजकीय पक्ष म्हणून भक्कम आहे.  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा तीन जिल्ह्यात मिळून 2 खासदार, 7 आमदार अशी त्यांची मोठी ताकद आहे. मात्र रिफायनरीविरोधी वातावरणामुळे त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हा विचार करून नागपूर अधिवेशनात जमीन अधिग्रहणाचा अध्यादेश रद्द करण्याचे आश्वासन सेनेने यापूर्वी दिले होते. पण तसे काही झाले नसल्यामुळे ग्रामस्थ सेनेवर नाराज आहेत. दरम्यान, आजच्या वर्षा वरील बैठकीकडे कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com