करमाळा (सोलापूर): आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावरील 8 कोटी 80 लाख रुपये बागलांनी थेट मकाई साखर कारखान्याच्या खात्यात घेतले आहेत. असे प्रकार करुन आदिनाथ कारखाना जाणीवपूर्वक अडचणीत आणला जात आहे. ही रक्कम आदिनाथने एमएसीबीकडुन कर्ज म्हणून घेतलेली आहे. या कर्जाचे व्याज आदिनाथ भरणार आणि पैसे मात्र मकाई वापरणार आहे. बागलांनी दोन्ही कारखाने अडचणीत आणण्याचा घाट घातला असल्याचा आरोप शिवसेना आमदार नारायण पाटील केला आहे.
ते करमाळा येथिल पत्रपरिषदेत बोलत होते. पुढे बोलताना आमदार नारायण पाटील म्हणाले, आदिनाथ साखर कारखाना उभा राहावा म्हणून माझे वडील गोविंदबापू पाटील यांनी मोठे परिश्रम घेतले. आता हा कारखाना बागल कुटुंबाकडे आहे. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना चांगला चालावा म्हणून संचालक बोर्डाने कर्ज घेतले. परंतु बागल यांनी या कारखान्याची रक्कम श्री मकाई कारखान्याला घेतली आहे. मकाई कारखाना स्थापनेपासुन बागल गटाच्या ताब्यात असुनही हा कारखाना मोठ्या अर्थिक अडचणीत आहे. बागलांनी दोन्ही कारखाने अडचणीत आणले आहेत. तालुक्यातील आदिनाथ व मकाई ही दोन साखर कारखाने हे शेतकऱ्यांचे आहेत. मात्र बागल यांनी दोन्ही कारखान्याचा वैयक्तीक स्वार्थासाठी वापर करून कारखाने डबघाईला आणले आहेत.
आदिनाथ सह साखर कारखान्याचे 8 कोटी 80 लाख रूपये उसने म्हणुन मकाईला दिले आहेत.मकाईला एमएसीसी बॅंकेचे कर्ज मिळाले की ही रक्कम परत मिळणार आहे.
-संतोष जाधव-पाटील,अध्यक्ष आदिनाथ सह साखर कारखाना
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.