आता रश्मी बागलांना पराभव मान्य करावाच लागेल!

न्यायदेवतेनेही बागलांना नाकारले आहे :नारायण पाटील
आता रश्मी बागलांना पराभव मान्य करावाच लागेल!

करमाळा (सोलापूर): करमाळा विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले शिवसेना उमेदवार नारायण पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवार रश्मी दिंगबर बागल यांनी दाखल केलेली याचीका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. तत्कालिन निवडणुक निर्णय अधिकारी अविनाश हदगल यांनी दिलेला निर्णय कायम ठेवत आमदार नारायण पाटील यांच्या बाजुने निकाल दिला आहे. 

न्यायाधीश के.आर. श्रीराम यांनी हा निकाल दिला आहे. 
2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार नारायण पाटील  257 मतांनी विजयी झाले. यावेळी बाद करण्यात आलेल्या पोस्टल मताची मोजणी करावी अशी मागणी रश्मी बागल यांनी केली, मात्र बाद मते मोजता येणार नाहीत हा निर्णय निवडणुक निर्णय अधिकारी अविनाश हदगल यांनी घेत शिवसेनेचे नारायण पाटील यांना विजयी घोषित केले. 

या निर्णयाच्या विरोधात रश्मी बागल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत त्यांनी विद्यमान आमदार नारायण पाटील यांचेसह  निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक आयुक्त व इतर उभे असलेले सर्व उमेदवार यांना प्रतिवादी म्हणून समाविष्ट केले होते. निवडणुक आयोगाने पोस्टल मतांच्या ग्राह्यतेबद्दल वादी बागल यांनी घेतलेला आक्षेप हा चुकीचा असुन आम्ही जी मतमोजणी प्रक्रिया अंमलात आणली तीच योग्य व नियमानुसार असल्याचे उच्च न्यायालयात स्पष्ट केले. यानंतर न्यायालयाने निवडणुक निर्णय अधिकारी, निवडणूक आयुक्त व इतर उभे असलेले सर्व उमेदवार यांना वगळुन याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आमदार श्री. पाटील व रश्मी बागल यांच्या बाजु ऐकुण मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका रद्द ठरवत निकाल दिला. 

उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात बागल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने बागल यांचे आपील स्वीकारून पुन्हा ते निर्णयासाठी मुंबई उच्च न्यायालयात पाठवले. त्यानंतर पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून निवडणुक आयोगाचा निकाल कायम ठेवत निकाल दिला आहे. आमदार पाटील यांचे वतीने अॅड. विश्वजीत सावंत, अॅड. प्रभाकर जाधव व अॅड.एस.पी. लुणावत यांनी काम पाहिले.

अखेर विजय जनशक्तीचा झाला असून न्यायदेवतेनेही बागलांना नाकारले आहे. वास्तविक पाहता रश्मी बागल यांनी पराभव मान्य करुन एका सक्षम विरोधकाची भुमिका निभावणे गरजेचे होते. परंतु बागल गटाने जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चार वर्ष चालू ठेवला. अखेर सत्याचा विजय होतोच हे या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.
-आमदार नारायण पाटील, करमाळा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com