देश शोकसागरात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभा कसे घेतात? : प्रा. जोगेंद्र कवाडे

''मद्य, गोमांस वाहून नेणाऱ्या वाहनांची तपासणी होते. मात्र तीनशे किलो स्फोटके नेणाऱ्या गाडीची तपासणी का झाली नाही? हा मला पडलेला गंभीर प्रश्‍न आहे. सध्या सत्तेत असलेल्या केंद्रातील सरकारला देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांविषयी कोणतीच आपुलकी नाही. देश दुखःसागरात बुडालेला असतांना भाजपची मंडळी राजकीय सभांमध्ये दंग होती. यावरुनच त्यांची खरी ओळख होते," अशी टिका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.
देश शोकसागरात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभा कसे घेतात? : प्रा. जोगेंद्र कवाडे

नाशिक : ''मद्य, गोमांस वाहून नेणाऱ्या वाहनांची तपासणी होते. मात्र तीनशे किलो स्फोटके नेणाऱ्या गाडीची तपासणी का झाली नाही? हा मला पडलेला गंभीर प्रश्‍न आहे. सध्या सत्तेत असलेल्या केंद्रातील सरकारला देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांविषयी कोणतीच आपुलकी नाही. देश दुखःसागरात बुडालेला असतांना भाजपची मंडळी राजकीय सभांमध्ये दंग होती. यावरुनच त्यांची खरी ओळख होते," अशी टिका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.

येथील जाणीव सांस्कृतिक अभियानतर्फे परशुराम सायखेडकर नाट्यगृहात प्रा. कवाडे यांना जाणीव पुरस्कार देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, सीआरपीएफचे जवान शहीद झाले. या घटनेने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभा घेताहेत. राजकीय साधनसुचीता आहे की नाही?. देश चालविणाऱ्या मंडळींना शहीदांचे काहीच वाटत नाही. कुठे गेली यांची संवेदनशीलता?. मद्य, गोमांस वाहून नेणाऱ्या वाहनांची तपासणी होते, मात्र तीनशे किलो आरडीएक्‍स वाहून नेणाऱ्या वाहनांची तपासणी का होत नाही? असेही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले.

प्रा. कवाडे पुढे म्हणाले, "ज्या सैनिकांनी देशासाठी रक्ताचे पाणी केले, बलिदान दिले, त्यांच्याविषयी राजकर्त्यांना काहीच वाटत नाही. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशपेक्षा इतर राज्यांची अधिक चिंता आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेही पंतप्रधानांच्या प्रचारसभेत फिरत आहेत. जे जवान शहीद झाले, ते कोणत्या जातीसाठी अथवा धर्मांसाठी शहीद झाले नाही, तर ते देशासाठी शहीद झालेत. आमचा देश संतांचा, महापुरूषांचा आहे. पण संत आणि महापुरूषांना जातीच्या कोंडवाड्यात अडकवले आहे. या व्यवस्थेमुळे कित्येक वर्षे गुलामगिरीत रहावे लागले. म्हणूनच जातीचा अंत जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत समतेचा उदय होणार नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com