शेतकऱ्यांच्या हातात पाटी देवून पंचनामे करण्याचीही पध्दत आहे का ?  - जयंत पाटील 

गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या हातात पाटी देवून पंचनामे करण्यात आले ही पंचनाम्याची पध्दत आहे का ? आपल्या राज्यात शेतकऱ्यांशी असा व्यवहार होत असेल तर या सरकारची शेतकऱ्यांबाबत काय मानसिकता आहे हे दिसून येते.-जयंत पाटील
devendra_and_jayant_patil
devendra_and_jayant_patil

मुंबई  : " गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या हातात पाटी देवून पंचनामे करण्यात आले ही पंचनाम्याची पध्दत आहे का ? आपल्या राज्यात शेतकऱ्यांशी असा व्यवहार होत असेल तर या सरकारची शेतकऱ्यांबाबत काय मानसिकता आहे हे दिसून येते, "असा टोला राष्ट्रवादी काँग्रसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी सरकारला लगावला. विधानसभेमध्ये नियम २९३ अन्वये उपस्थीत केलेल्या प्रस्तावावर जयंत पाटील बोलत होते. 

शेतकऱ्यांच्या अवस्थेवर टिप्पणी करत सरकारला धारेवर धरत जयंत पाटील म्हणाले, " राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला वारंवार सांगूनही हे सरकार कोडगे झाले आहे. शेतकऱ्यांना सरकारने ठोस अशी मदत करावी अशी मागणी करत आहोत परंतु हे गेंड्याच्या कातडीचे बनलेले सरकार याकडे लक्षच द्यायला तयार नाही. देशाचे पिकांचे विक्रमी उत्पादन झाले आहे. आयातीवर निर्बंध घातले जावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे."

" मात्र आयात वाढली आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या हातात कमी पैसे मिळत आहेत. शेतकऱ्यांसाठी यांनी केंद्रे खुली केली नाही याचा फायदा व्यापाऱ्यांना झाला. तूरीला कवडीमोल भाव दिला जात आहे. ५२ टक्के शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. गारपीटीने शेतकऱ्यांना झोडपले आहे. आज महागाई वाढली आहे. पेट्रोलचे, डिझेलचे दर वाढले आहेत. मात्र हे सरकार शेतकऱ्यांना त्यापध्दतीने मदत देत नाही. आम्ही शेतकऱ्यांचा विचार करायचो मात्र आताच्या सरकारमध्ये आणि मागच्या सरकारमध्ये जमीन आस्मानचा फरक आहे ," असा चिमटाही पाटील यांनी काढला. 

जयंत पाटील पुढे म्हणाले, " शेतकऱ्यांना विशेष पॅकेज दिले पाहिजे.  कोरडवाहू शेतीसाठी २५ हजार हेक्टरी तर बागायतदार शेतीसाठी ५० हजार हेक्टरी मदत दयावी . वीजेचे प्रश्न अजुनही सुटलेला नाही आज तर शेतकऱ्यांना नोटीसीही दिल्या जात आहे. राज्याचे कृषी खाते बेजबाबदारपणे काम करत आहे. हा कृषी खात्याचा अकार्यक्षम कारभाराचा नमुना आहे. " 

"किटकनाशकामुळे ५५ शेतकरी दगावले. ५०० शेतकरी जखमी झाले. त्यांना फक्त ५ हजार मदत दिली. एका शेतकऱ्याने याचिका दाखल केली. त्यामुळे इच्छा नसताना ४ लाख मदत दयावी लागली. बोंडअळीसंदर्भात अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीची मदत मिळालेली नाही. सरकारने बियाणे कंपनीकडून पैसे वसूल करु असे सरकारने सांगितले होते. परंतु पैसे द्यायला कंपन्या वेड्या आहेत का ? कंपन्या गेल्या कोर्टात आणि तुम्ही हात वर केले आहेत. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन द्या आणि शेतकऱ्यांना दुप्पटीने मदत करा," अशी मागणीही पाटील यांनी वेळी बोलताना केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com