इंदापूर तालुक्यामध्ये कालव्याच्या पाण्यावरुन पुढाऱ्यांची कावकाव....

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खडकवासल्याच्या पाण्यासाठी २० सप्टेंबर रोजी पुणे -सोलापूर महार्गावर रास्तारोको आंदोलन करुन भरणे यांच्यावर टीकेचे झोड उडवली.यानंतर भरणे यांनाही पत्रकार परिषद घेवून पाटील यांच्यावर टीका केली.
Bharane_harshvardhan_patil
Bharane_harshvardhan_patil

वालचंदनगर :  इंदापूर तालुक्यामध्ये कालव्याच्या पाण्यावरुन आमदार दत्तात्रेय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह राजकीय पुढाऱ्यांची श्रेय लाटण्यासासाठी ‘कावकाव’ सुरु अाहे. मात्र शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळत नसल्याने शेतकरी कोमात तर पुढारी जोमात अशी पर परस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या महिन्यामध्ये खडकवासला धरणातुन इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी सुरु असलेले पाण्याचे आवर्तन पाणी पाटबंधारे विभागाने बंद केल्यानंतर खडकवासल्याच्या पाण्याचा प्रश्‍न पेटला.

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खडकवासल्याच्या पाण्यासाठी २० सप्टेंबर रोजी पुणे -सोलापूर महार्गावर रास्तारोको आंदोलन करुन भरणे यांच्यावर टीकेचे झोड उडवली.यानंतर भरणे यांनाही पत्रकार परिषद घेवून पाटील यांच्यावर टीका केली. 

यामध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनीही उडी घेवून दोन्ही पक्ष नौटंकी करत असुन आमच्यामुळेच पाणी आल्याचे सांगू लागले.  भरणे व पाटील दोघे ही कालवा सल्लगार समितीच्या सदस्यांवरुन एकमेकावर टीका करुन तोंडसुख घेवू लागले.

 ४ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये झालेल्या कालवा समितीची बैठक झाल्यानंतर भरणे व पाटील यांच्यामध्ये कालवा सल्लगार समितीच्या सदस्यावरुन आरोपप्रत्यारोप वाढले.

यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष महारुद्र पाटील, कॉग्रेसचे अध्यक्ष अॅड.कृष्णाजी यादव,नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनाही उडी घेवून एकमेकांच्या पक्षावर टीका करण्यास सुरवात केली.

तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस पक्षाच्या प्रतिनिधी व पुढाऱ्यांची पाण्याच्या प्रश्‍नावरुन श्रेयासाठी कावकाव सुरु असल्याने सर्वसामान्य शेतकरी मात्र वैतागलेला आहे.

 खडकवासला धरणातुन इंदापूर तालुक्याला पाणी मिळणार नसल्याने तालुक्यातील  सुमोर दहा हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली अाहेत.तसेच भादलवाडी, तरंगवाडी,पळसदेव,कळस सहीत अनेक तलाव कोरडे राहणार असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे.

तालुक्यात चालू वर्षी पावसाने पाठ फिरवली असल्याने नीरा डाव्या कालव्याच्या पाण्यावरती ताण येत असुन उभ्या पिकांना पाणी देण्याचे काम सुरु असल्यामुळे शेटफळ तलावासह इतर तलावामध्ये पाणी नसल्याने शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

तालुक्यामध्ये पाण्याची परस्थिती गंभीर असताना पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी पुढाऱ्यांची कावकाव सुरु असल्याने शेतकरी काेमात...अन् पुढारी जोमात अशी  परस्थिती आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com