...तर अडसूळ साहेबांचे आशीर्वाद घेईन : नवनीत राणा 

"आनंदराव अडसूळ यांना अमरावतीच्या जनतेने दोनवेळा निवडून दिले. ते ज्येष्ठ आहेत. त्यांचा संसदेतील अनुभव दांडगा आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. त्यांनी परवानगी दिली तर त्यांच्या घरी जाऊन मी त्यांचे आशीर्वाद घेईन," असे उद्‌गार आज नवनियुक्त खासदार नवनीत राणा यांनी काढले.
...तर अडसूळ साहेबांचे आशीर्वाद घेईन : नवनीत राणा 

अमरावती : "आनंदराव अडसूळ यांना अमरावतीच्या जनतेने दोनवेळा निवडून दिले. ते ज्येष्ठ आहेत. त्यांचा संसदेतील अनुभव दांडगा आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. त्यांनी परवानगी दिली तर त्यांच्या घरी जाऊन मी त्यांचे आशीर्वाद घेईन," असे उद्‌गार आज नवनियुक्त खासदार नवनीत राणा यांनी काढले. 

लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ''लग्न झाल्यावर मुलीचे सासर हेच शेवटचे घर असते. त्यामुळे अमरावती हेच माझे घर आहे, येथील प्रश्‍न मिटावेत, विकास व्हावा या दृष्टीने सुरुवातीपासूनच मी व रवी राणा सातत्याने कार्यरत होतो. हळूहळू लोक जुळत गेले. आमच्याविषयी त्यांची आत्मियता वाढत गेली. विश्‍वास निर्माण झाला, त्यामुळेच आज अनेकांच्या कुटुंबातील सदस्यांची माहितीसुद्धा माझ्याकडे आहे. ते आमच्या युवा स्वाभिमान या कुटुंबाचेच सदस्य झाले आहेत. लोकांसाठी काम करणे हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून कामे करत गेलो व एक -एक पाऊल पुढे पडत गेले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मी कुण्या एका विशिष्ट पक्षाची उमेदवार नव्हते. सर्वच पक्ष, संघटना, समुदायाने साथ दिली. ज्यांना उघडपणे काही करता आले नाही ते घरी बसून माझे काम करीत होते. नऊ वर्षांपासून केलेली मेहनत, जोडलेले लोक, त्यांच्यावर दाखविलेला विश्‍वास व त्यांना दिलेले बळ हेच माझ्या विजयाचे रहस्य आहे." असे त्या म्हणाल्या.

सभी नटो का एकही पाना
'मोदी है तो मुनकिन है' ही घोषणा देशाच्या कानाकोपऱ्यात गुंजत होती. आमच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा 'सभी नटो का एकही पाना, चुनकर लाओ नवनीत राणा' ही टॅगलाईन दिली व घराघरांत आम्ही पोचलो. नरेंद्र मोदी हे त्यांच्या कामामुळे निवडून आले. विकास हेच आमचेसुद्धा व्हीजन असल्याने सरकारकडून अमरावतीच्या विकासासाठी निश्‍चितच बळ मिळेल, असा विश्‍वास खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला. 

लक्ष्य महाराष्ट्र, विदर्भ
संसदेत केवळ अमरावतीच नव्हे तर महाराष्ट्र तसेच विदर्भातील प्रश्‍न प्रामुख्याने मांडण्यात येतील. आजवर स्थानिक पातळीवर अनेक प्रश्‍नांसाठी लढा दिला आहे. रवी राणा हे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर कारागृहातसुद्धा गेले. त्यामुळे संसदेत अमरावतीचा आवाज बुलंद केल्या जाईल, असे नवनीत राणा म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com