... तर बुद्धिजीवींना गोळ्या घातल्या असत्या; भाजप आमदाराची मुक्ताफळे 

... तर बुद्धिजीवींना गोळ्या घातल्या असत्या; भाजप आमदाराची मुक्ताफळे 

बंगळूर : बुद्धिजीवींमुळेच आमचा देश खराब होत आहे. मी राज्याचा गृहमंत्री राहिलो असतो तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला असता, असे वादग्रस्त वक्तव्य विजापूर येथील भाजपचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी केले. 

विजापूर येथे आयोजित केलेल्या 19 व्या कारगिल विजयोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, की देशद्रोही संघटनांमुळे आमच्या देशाचे नुकसान होत आहे. राजकारणी लोक देशविरोधी कार्य करीत आहेत. जवान 60 अंश तापमानातही काम करीत असतात; परंतु आम्हाला तीन किलोमीटर चालत जाता येत नाही, अशी आमच्या देशाची स्थिती आहे. 

भाषणात कॉंग्रेस व बुद्धिजीवींविरुद्ध टीका करताना पाटील-यत्नाळ म्हणाले, की काश्‍मीरमधील लोकही देशाविरुद्ध घोषणा देत असतात. तरीही अशा लोकांना देशातील काही लोक पाठिंबा देतात. आमच्या देशांच्या सीमांचे, देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्याबद्दलही ते अवमानकारक वक्तव्य करतात, ही शोकांतिका आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com