आंबेडकरांच्या सभेला गर्दी जमते..पण मते मिळत नाहीत : आठवले यांची टीका

आंबेडकरांच्या सभेला गर्दी जमते..पण मते मिळत नाहीत : आठवले यांची टीका

जालना : वंचित विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला माणसे जमतात. पण त्यांना मते मिळणार नाहीत, असा दावा केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केला.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी वंचित विकास आघाडीवर टीका केली.  वंचित बहुजन आघाडी एकटी लढली तर त्यांच भविष्य `प्रकाशमय` असणार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा शिवसेना, भाजपा आणि आरपीआयला चांगला होणार आहे. त्यांनी  कितीही प्रयत्न केला तरी निवडून येण्यासाठी लागणारे मत मिळविणे शक्य नसल्याचाही अंदाज त्यांनी मांडला.

वंचित आघाडी ही वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी आहे. वंचित आघाडीतल्या नेत्यांना सत्ता हवी असल्यास त्यांनी माझ्या सोबत यावे. वंचित आघाडीची जी हवा आहे ती हवा त्यांना निवडून आणणारी हवा नाही. ती हवा शिवसेना- भाजपला निवडून आणणारी हवा आहे. यापूर्वी 2009 मध्ये आम्ही हा प्रयत्न करून पाहिला आहे. सभेला माणसे जमतात. मात्र मत मिळत नाहीत, असे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com