जगभरात विखुरलेल्या हिंदूंनी एकत्र यावे, मोहन भागवंताचे आवाहन 

जगभरात विखुरलेल्या हिंदूंनी एकत्र यावे, मोहन भागवंताचे आवाहन 

शिकागो : सर्वांच्या भल्यासाठी जगभरात विखुरलेल्या हिंदूंनी आपापसांतील मतभेद विसरून एकत्र येणे आवश्‍यक आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 

शिकागो येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या जागतिक हिंदू परिषदेत सुमारे दोन हजार श्रोत्यांसमोर सरसंघचालक भागवत यांनी त्यांचे विचार मांडले. ""हिंदूंनी कशातही मागे राहू नये. आपण हजारो वर्षांपासून का सहन करत आहोत? आपल्याकडे सर्व काही आहे आणि आपल्याला बरेच काही माहिती आहे. मात्र, आपण त्या ज्ञानाचा वास्तव जीवनात वापर करण्यास विसरलो आहोत, आपण एकत्र येण्यासही विसरलो आहोत. त्यामुळे जगभरातील हिंदूंनी मतभेद विसरून सर्वांच्याच भल्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे,'' असे भागवत म्हणाले. 

हिंदूंनी प्रगती करण्यासाठी सहकार्य आणि एकसंधपणा ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी महाभारतातील काही उदाहरणेही दिली. आपली प्राचीन मूल्ये ही वैश्‍विक असून, आता त्याला हिंदू संस्कार म्हटले जाते, हिंदू समुदायामध्ये अनेक बुद्धिमान लोक असले तरी आपण एकत्र येऊन काम करत नाही, असेही ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com