धनगरांना आदिवासी कोट्यातील आरक्षण मिळालेच पाहिजे: हार्दिक पटेल

धनगर आरक्षणावरुन राज्यातील फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
धनगरांना आदिवासी कोट्यातील आरक्षण मिळालेच पाहिजे: हार्दिक पटेल

पुणे :  फडणवीस सरकारने धनगरांना आदिवासीं कोट्यात आरक्षण देण्याचे आश्वासन पाळले नाही. मोदी, फडणवीसांनी धनगर समाजाला केवळ आश्वासने देऊन फसवणूक केली आहे. त्यामुळे आता जर ते ऐकत नसतील तर त्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन गुजरातमधील पटेल आरक्षणाचे नेते हार्दिक पटेल यांनी सांगलीत धनगर समाजाला उद्देशून केले.

 धनगर आरक्षणासाठी आरेवाडीत मंगळवारी गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकाराने झालेल्या मेळाव्यात हार्दिक पटेल यांना निमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, पटेल यांनी व्यासपीठावरुन गुजरातमधील आपल्या पटेल आरक्षणासाठीच्या लढ्याची माहिती उपस्थितांना दिली तसेच धनगर आरक्षणावरुन राज्यातील फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

या मेळाव्यापूर्वी फडणवीस हे खूप ताकदवान असल्याचे आपल्याला सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना घाबरण्याचे कारण नाही. कारण महाराष्ट्रात मोदी-शाहांसारखे गुंड नाहीत, अशी कडवी टीका त्यांनी मोदी-शाहंवर केली. तसेच रा. स्व. संघावरही टीका करताना संघ सर्वांची दिशाभूल करतोय असे ते म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com