शेतकऱ्यांच्या नावावर  तूर विकल्यास कारवाई : मुख्यमंत्री

जेवढी तूर आघाडी शासनाने पंधरा वर्षांच्या कार्यकाळात खरेदी केली नाही. तेवढी तूर विद्यमान सरकारने केवळ या वर्षी खरेदी केल्याचा दावा फडणवीस यांनी केला.
DEVENDRA-FADANVIS
DEVENDRA-FADANVIS

नागपूर :  नाफेड व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेली सर्व तूर राज्य सरकार खरेदी करेल, शेतकऱ्यांनी याची काळजी करू नये. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे आहे. मात्र शेतकऱ्यांच्या नावावर तूर विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यांची गय करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिला.  

नागपुरात आले असता ते एका कार्यक्रमात बोलत होते. तूर खरेदीवरून विरोधक राजकारण करीत असून त्यांच्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. आघाडी सरकारच्या कार्यकाळात तुरीचे जेवढी उत्पादन झाले  त्याचे त्यांना नियोजन करता आले नव्हते. मात्र गेल्या पंधरा वर्षांत यंदा राज्यात प्रथमच विक्रमी  तुरीचे  उत्पादन झाले आहे. जेवढी तूर आघाडी शासनाने पंधरा वर्षांच्या कार्यकाळात खरेदी केली नाही. तेवढी तूर विद्यमान सरकारने केवळ या वर्षी खरेदी केल्याचा दावा फडणवीस यांनी केला. खरेदी केंद्रावरील शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत तुरीचा प्रश्‍न पूर्णपणे मार्गी लावला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com