पुण्याच्या पाण्यासाठी आमदारकीचे राजीनामे द्या ! मोहन जोशींची बापटांसह भाजप आमदारांना आव्हान 

पुण्याच्या पाण्यासाठी आमदारकीचे राजीनामे द्या ! मोहन जोशींची बापटांसह भाजप आमदारांना आव्हान 

पुणे : विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात पुण्याला पाण्याचा न्याय्य वाटा देण्याचा निर्णय घ्यावा. भाजपच्या आठ आमदारांनी तोंडदेखल्या मागण्या करून नयेत. जर हक्काच्या पाणी मिळत नसेल तर आठही आमदारांनी पुणेकरांसाठी आमदारकीचे राजीनामे द्यावेत, असे आव्हान कॉंग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी आज दिले. 

पुण्याच्या पाणी पुरवठ्यात गेल्या एक महिन्यापासून गोंधळ आहे. अपुरा पाणी पुरवठा होत आहे. मात्र लोकप्रतिनिधी फारसे काही करताना दिसत नाहीत. 
एकवेळ पाणी पुरवठ्याने पुणेकरांचे आणखी हाल होत आहेत. पाणी पुरवठ्याबाबत हेतुतः गैरसमज पसरविले जाऊन पुण्यावर पाणी वाटपात अन्याय केला जातो. गेल्या दोन तीन वर्षात भाजप सरकारच्या निष्कीयतेचा फटका पुणेकरांना बसत आहे. पुण्याला पाणी पुरविणाऱ्या चारही धरण क्षेत्रात यंदा पुरेसा पाऊस झाला आणि धरणात पुरेसा पाणीसाठा असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर ऑक्‍टोबर महिन्यात कपात करण्यात आली, असा आरोप जोशी यांनी केला आहे. 

पुण्याच्या पूर्व भागाला भामा आसखेड प्रकल्पातून पाणी पुरविण्याची योजना होती . या सरकारला त्यात यश आलेले नाही . पाण्याची गळती थांबविण्यात अपयश आले आहे. पुणेकरांना 24 तास पाण्याचे आश्वासन दिले. याकरिता कर्ज काढले पण ही योजना फसली आहे. दोनशे कोटींच्या कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड करदात्या पुणेकरांवर पडत आहे. एकेकाळी मुबलक पाणी असणाऱ्या पुणेकरांना आता हक्काच्या पाण्यासाठी झगडावे लागत आहे, ही दुर्दैवी स्थिती राज्यात व महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने आणल्याचा आरोपह जोशी यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com