पाच हजार कोटी देतो, कर्जमाफी करून दाखवा  - फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार 

DEVNDRA-PHADANVIS
DEVNDRA-PHADANVIS

मुंबई :  "आमच्या सरकारने जर 5 हजार कोटी रूपयांचीच कर्जमाफी दिली असे जर राहुल गांधी म्हणत असतील तर मी त्यांना 5 हजार कोटी रूपये देतो, त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवावी," असे आव्हान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना दिले.

राहुल गांधी यांनी नांदेडमध्ये झालेल्या एका सभेत राज्य सरकारने 35 हजार कोटींची नव्हे तर 5 हजार कोटींचीच कर्जमाफी दिली असल्याची टीका केली होती, त्या टिकेचा समाचार घेत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांना आव्हान दिले.

राज्यात मागील पंधरा वर्षांत तुमचीच सत्ता होती, तुम्ही जर शेतकऱ्यांसाठी चांगले काम केले असते तर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या नसल्या, हे त्यांचेच फळ असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावत राहुल गांधीवर पलटवार  केला. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण राज्यातील शेतकऱ्यांना आपण आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देत असल्याचा दावाही करत राहुल गांधी कर्जमाफीच्या प्रश्‍नावर खोटे बोलत असल्याचेही म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com