जनतेशी बांधिलकी, विधीमंडळात प्रश्‍न मांडणार : खडसे 

जनतेशी बांधिलकी, विधीमंडळात प्रश्‍न मांडणार : खडसे 

जळगाव : जनतेशी आपली बांधिकली असून त्यांचे प्रश्‍न आपण विधिमंडळात मांडणार आहोत असे मत राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. 

राज्याचे विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या (ता.27)पासून सुरू होत आहे. याबाबत बोलतांना खडसे म्हणाले, जिल्ह्यात शालेय विद्यार्थिनीवर अत्याचाराच्या तीन घटना घडल्या आहेत. या घटना अत्यंत गंभीर आहेत. पास्को कायद्याचीही आता भिती राहिल्याचे दिसत नाही. त्यामुळे यांना फाशीची शिक्षा देण्याचाच कायदा केला पाहिजे. या घटनेतील जे संशयित असतील त्यांना सेवेतून निलंबीत न करता त्यांना थेट बडतर्फच केले पाहिजे. 

याबाबत आपण विधीमंडळात प्रश्‍न उपस्थित करणार आहोत. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प रखडलेले आहेत. गेल्या चार वर्षात एकही प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. त्याबाबत शासन काय करणार आहे? याबाबतही विचारणा करण्यात येईल, "मग्नेटीक महाराष्ट्र'योजनेत जळगाव जिल्ह्याला काहीही दिले नाही. त्याची तरतूद करण्यात यावे अशी आपली मागणी असणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com